अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर तिच्या आगामी "ईठा" चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. तथापि, अभिनेत्रीच्या टीमने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. असे वृत्त आहे की श्रद्धा कपूरला सेटवर गंभीर दुखापत झाली होती यामुळे निर्मात्यांना शूटिंग थांबवावे लागले.


श्रद्धा कपूर "ईठा" चित्रपटाच्या एका लावणीचे शूट करत होती. यासाठी तिने पारंपरिक नऊवारी साडी, जड दागिने आणि कंबरेचा पट्टा घातला होता. या शूट दरम्यानच तिचा अपघात झाला. या चित्रपटासाठी श्रद्धाने तिचं १५ किलो वजन वाढवले आहे. भारी वजनामुळे नऊवारी साडी आणि लावणी करता करता श्रद्धा कपूरचा तोल गेला आणि ती जोरात पडली. तिच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली. शिवाय, तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचेही वृत्त आहे. 'ईठा' चित्रपटाचे चित्रीकरण मड आयलंडमध्ये सुरू आहे. दुखापतीनंतर, युनिटने ताबडतोब शूटिंग थांबवले. श्रद्धा कपूर बरी होईपर्यंत निर्मात्यांनी चित्रीकरण थांबवले आहे. युनिट आता तिच्या पूर्ण बरे होण्याची वाट पाहणार आहे.

Comments
Add Comment

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित