अंबरनाथमध्ये भरधाव चारचाकीचा थरकाप उडवणारा अपघात! तरूण थेट पुलावरून खाली कोसळला

ठाणे: मुंबई नजीकच्या अंबरनाथ शहरात काल (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी अपघाताची मोठी दुर्घटना घडली. अंबरनाथ शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर ही अपघाताची दुर्घटना घडली. ज्यात एका भरधाव चारचाकीने अनेक वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की एकजण थेट ब्रिजच्यावरून खाली कोसळला. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.


अंबरनाथ शहरातील हुतात्मा चौकाहून निघालेली एक चारचाकी वाहतूककोंडी नसल्याने वेगाने अंबरनाथ पश्चिमेकडे जात होती. यावेळी चालकाला गती नियंत्रित न झाल्याने गाडीवरील ताबा सुटला. ज्यामुळे अनियंत्रित गाडी पुढे असणाऱ्या आणि विरूद्ध दिशेने येणाऱ्या इतर गाड्यांना धडकली. यामुळे इतर गाड्यांचे नुकसान तर झालेच, पण नागरिकांना पण फटका बसला. पोलीस सध्या घटनेचा सखोल तपास करत आहेत.


या अपघातांमध्ये धडक देणारी भरधाव कारदेखील पलटी झाली. संबंधित घटना पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे अपघाताचे तपशील समजण्यात मदत झाली. मात्र या व्हिडीओमुळे थरकाप उडाला आहे. या घटनेतील जखमींवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जखमींवर खासगी रुग्णालयातही उपचार सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणात सध्या पोलीस गाडी मालकाची आणि चालकाची तपासणी करत आहेत.

Comments
Add Comment

सोसायटीच्या परवानगीविना विकासकाला मजला वाढविण्याची परवानगी

बांधकाम परवानगी रद्द करण्याची रहिवाशांची मागणी कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली पालिकेचा अजब कारभार समोर

Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी' वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या

ठाणे रुग्णालयाच्या पाडकामात आढळली शेकडो वर्षे दडलेली शिल्पकला

कोरीव प्रतिमा असलेल्या प्राचीन शिल्पांनी सर्वसामान्यांत उत्सुकता ठाणे : इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या

बदलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

बदलापूर  : ''माझ्या नेत्याला जर कोणत्या पदावरून राजीनामा द्यावा लागत असेल, तर त्यांच्या सन्मानार्थ मीसुद्धा

ये पब्लिक है, सब जानती है!

केडीएमसीच्या महापौरपदावर खा. श्रीकांत शिंदे यांचे उत्तर कल्याण  : ''ये पब्लिक है, सब जानती है. कुणीही काहीही बोलो,

ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी सहा महिने वाहतुकीत बदल

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले आहे.