ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी सहा महिने वाहतुकीत बदल

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले आहे. या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून बोगदे तयार केले जात आहे. त्यानिमित्ताने विविध वाहने, यंत्रांची वाहतूक करणारी वाहने या भागातून वाहतूक करणार आहे. या कामादरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.


हे वाहतूक बदल शुक्रवारपासून ते ११ मे २०२६ पर्यंत लागू केले आहेत. घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी, मानपाडा, ब्रम्हांड भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहन चालक मुल्ला बाग मार्गे वाहतूक करत असतात. येथील वाहतूक बदलाचा परिणाम वाहन चालकांना होण्याची शक्यता आहे.


ठाणे, भिवंडी, कल्याणकरांना बोरिवली गाठण्यासाठी घोडबंदर मार्गाचा वापर करावा लागतो; परंतु या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट आहे. घोडबंदर घाट रस्त्यात दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत असून कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे ठाणे-बोरिवली प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सध्या सुरू आहे.


बंदीची वेळ : रोज रात्री १:०० ते सकाळी ६:०० आणि दुपारी १२:०० ते सायंकाळी ६:००
बंद मार्ग : हिल क्रेस्ट सोसायटी, मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग : हिल क्रेस्ट सोसायटी, मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारी वाहने नीलकंठ ग्रीनकडून मुल्ला बागकडे येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग केलेल्या मार्गाने विरुद्ध दिशेने जातील.
नियमातून वगळलेली वाहने : पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने.

Comments
Add Comment

Shivsena Latur : लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी गर्दी, राज्यभरातून शिवसेनेचा वाढतोय

Eknath Shinde : पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचे आडाखे बांधून काँग्रेसची देशद्रोही मानसिकता उघडी पडली!

देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी काँग्रेसवर शिंदेंची सडकून टीका ठाणे : अमेरिकेचे

“इंटिग्रेटेड ग्राम विकास मॉडेल”ची मांडणी; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील १०० तलाव गाळमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी सामाजिक संस्था आणि

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Shivshahi Bus Fire : ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेटीस ब्रिजवर आज म्हणजेच गुरुवार २३ एप्रिल रोजी ‘शिवशाही’ बसला अचानक भीषण आग

Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल

ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या