पुण्यातील कचरावेचक कामगार अंजू माने यांनी १० लाखांची बॅग परत करून दिला मानवतेचा संदेश

पुणे : जिथे दैनंदिन जीवनात पैशासाठी लोक अनेकदा अनैतिक मार्ग स्वीकारताना दिसतात, तिथे पुण्यातील एका मेहनती महिलेने समाजासमोर प्रामाणिकतेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. कचरावेचक कामगार अंजू माने यांनी दाखवलेली सचोटी खरोखर प्रेरणादायी आहे. रोजच्या जगण्यासाठी कष्ट करणाऱ्या या महिलेला कचरा वेचताना १० लाखांहून अधिक रक्कम असलेली बॅग सापडली, तरीही पैशाच्या मोहापुढे झुकण्याऐवजी त्यांनी ती बॅग तिच्या मूळ मालकाकडे सुरक्षितरित्या परत केली.


अंजू माने या स्वच्छ संस्थेत कचरावेचक म्हणून काम करतात. त्यांच्या तीन पिढ्या हेच काम करत आल्या असून, स्वतः अंजू गेली तब्बल २० वर्षं पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत. नेहमीप्रमाणे त्या सकाळी सात वाजता दारोदार कचरा गोळा करत होत्या. आठच्या सुमारास फिडर पॉइंटकडे कचरा नेत असताना रस्त्याच्या कडेला एक मोठी पिशवी पडलेली त्यांना दिसली. परिसरात औषधांची दुकाने असल्याने अशा पिशव्या आधीही मिळाल्याचा अनुभव त्यांना होता. म्हणून मालक परत येईल या विश्वासाने त्यांनी ती पिशवी सुरक्षित ठेवली. नंतर त्यात औषधांसोबत मोठी रोकड असल्याचे दिसताच त्यांनी तातडीने परिसरातील लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.


त्या परिसरात अनेक वर्षं काम केल्यामुळे अंजू सर्वांना ओळखतात. शोध घेत असताना एक डिलिव्हरी बॉय अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत काहीतरी शोधताना दिसला. चौकशी केल्यानंतर तीच बॅग त्याची असल्याची खात्री झाली आणि अंजूंनी क्षणाचाही विलंब न करता ती बॅग त्याला परत केली. अत्यंत मौल्यवान रक्कम परत मिळाल्याने त्याला दिलासा मिळाला आणि त्याने कृतज्ञतेच्या भावनेतून अंजूंना ६०० रुपये बक्षीस दिले.


अंजूताई म्हणाल्या, “आपल्याकडचे काहीशे रुपये हरवले तरी मनातून जात नाही. इथे दहा लाखांची रक्कम होती. ती व्यक्ती किती चिंतेत असेल, याचाच विचार माझ्या मनात होता.”


अंजू माने यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुलींना त्यांनी शिक्षण दिले असून मुलगा वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. पती बाळासाहेब मानेही त्यांना कामात मदत करतात. हातात फक्त आठ हजार रुपयांचे मासिक उत्पन्न असतानाही पैशांचा लालच न ठेवता अंजू माने यांनी दाखवलेली निस्वार्थ भावना आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली