पुण्यातील कचरावेचक कामगार अंजू माने यांनी १० लाखांची बॅग परत करून दिला मानवतेचा संदेश

पुणे : जिथे दैनंदिन जीवनात पैशासाठी लोक अनेकदा अनैतिक मार्ग स्वीकारताना दिसतात, तिथे पुण्यातील एका मेहनती महिलेने समाजासमोर प्रामाणिकतेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. कचरावेचक कामगार अंजू माने यांनी दाखवलेली सचोटी खरोखर प्रेरणादायी आहे. रोजच्या जगण्यासाठी कष्ट करणाऱ्या या महिलेला कचरा वेचताना १० लाखांहून अधिक रक्कम असलेली बॅग सापडली, तरीही पैशाच्या मोहापुढे झुकण्याऐवजी त्यांनी ती बॅग तिच्या मूळ मालकाकडे सुरक्षितरित्या परत केली.


अंजू माने या स्वच्छ संस्थेत कचरावेचक म्हणून काम करतात. त्यांच्या तीन पिढ्या हेच काम करत आल्या असून, स्वतः अंजू गेली तब्बल २० वर्षं पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत. नेहमीप्रमाणे त्या सकाळी सात वाजता दारोदार कचरा गोळा करत होत्या. आठच्या सुमारास फिडर पॉइंटकडे कचरा नेत असताना रस्त्याच्या कडेला एक मोठी पिशवी पडलेली त्यांना दिसली. परिसरात औषधांची दुकाने असल्याने अशा पिशव्या आधीही मिळाल्याचा अनुभव त्यांना होता. म्हणून मालक परत येईल या विश्वासाने त्यांनी ती पिशवी सुरक्षित ठेवली. नंतर त्यात औषधांसोबत मोठी रोकड असल्याचे दिसताच त्यांनी तातडीने परिसरातील लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.


त्या परिसरात अनेक वर्षं काम केल्यामुळे अंजू सर्वांना ओळखतात. शोध घेत असताना एक डिलिव्हरी बॉय अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत काहीतरी शोधताना दिसला. चौकशी केल्यानंतर तीच बॅग त्याची असल्याची खात्री झाली आणि अंजूंनी क्षणाचाही विलंब न करता ती बॅग त्याला परत केली. अत्यंत मौल्यवान रक्कम परत मिळाल्याने त्याला दिलासा मिळाला आणि त्याने कृतज्ञतेच्या भावनेतून अंजूंना ६०० रुपये बक्षीस दिले.


अंजूताई म्हणाल्या, “आपल्याकडचे काहीशे रुपये हरवले तरी मनातून जात नाही. इथे दहा लाखांची रक्कम होती. ती व्यक्ती किती चिंतेत असेल, याचाच विचार माझ्या मनात होता.”


अंजू माने यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुलींना त्यांनी शिक्षण दिले असून मुलगा वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. पती बाळासाहेब मानेही त्यांना कामात मदत करतात. हातात फक्त आठ हजार रुपयांचे मासिक उत्पन्न असतानाही पैशांचा लालच न ठेवता अंजू माने यांनी दाखवलेली निस्वार्थ भावना आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन