महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षणावर आल्या फक्त १२९ हरकती सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकी करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. यासाठी १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हरकती - सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवसापर्यंत सर्व प्रशासकीय विभागातून १२९ हरकती - सूचना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करता मागील ११ नोव्हेंबर रोजी २२७ पैकी एसटी, एससी, ओबीसी, महिला वर्ग तसेच खुला प्रवर्ग याकरता आरक्षण सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी आरक्षित जागांसाठी ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये, २२७ जागांमधून एसटी - २ , एससी - १५ , ओबीसी - ६१ , महिलांसाठी ११४ जागांसाठी काढण्यात आलेली सोडत जाहीर करण्यात आली होती.



त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या दिग्गजांना धक्का बसला. अनेकांचे प्रभाग महिला आरक्षित तसेच ओबीसी झाल्याने अनेकांना घरी बसणे नाहीतर आसपासच्या प्रभागाचा शोध घेण्याची वेळ आली. या आरक्षण सोडतीबाबत निवडणूक विभागाने १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हरकती - सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवसापर्यंत विविध विभागातून १२९ हरकती - सूचना दाखल झाल्या झाल्याची माहिती मिळत आहे.

यावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे २१ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत सदर हरकती आणि सूचना यांवर योग्य तो निर्णय घेतील. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र