महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षणावर आल्या फक्त १२९ हरकती सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकी करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. यासाठी १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हरकती - सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवसापर्यंत सर्व प्रशासकीय विभागातून १२९ हरकती - सूचना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करता मागील ११ नोव्हेंबर रोजी २२७ पैकी एसटी, एससी, ओबीसी, महिला वर्ग तसेच खुला प्रवर्ग याकरता आरक्षण सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी आरक्षित जागांसाठी ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये, २२७ जागांमधून एसटी - २ , एससी - १५ , ओबीसी - ६१ , महिलांसाठी ११४ जागांसाठी काढण्यात आलेली सोडत जाहीर करण्यात आली होती.



त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या दिग्गजांना धक्का बसला. अनेकांचे प्रभाग महिला आरक्षित तसेच ओबीसी झाल्याने अनेकांना घरी बसणे नाहीतर आसपासच्या प्रभागाचा शोध घेण्याची वेळ आली. या आरक्षण सोडतीबाबत निवडणूक विभागाने १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हरकती - सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवसापर्यंत विविध विभागातून १२९ हरकती - सूचना दाखल झाल्या झाल्याची माहिती मिळत आहे.

यावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे २१ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत सदर हरकती आणि सूचना यांवर योग्य तो निर्णय घेतील. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती