निवडणुकीपूर्वीच भाजपने उधळला विजयाचा गुलाल! २४६ नगरपरिषदांपैकी १०० जागांवर बिनविरोध कमळ फुलले

मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज देखील भरले आहेत. तर १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख होती. या दिवसात अनेक उमेदवारांनी अर्ज माघे घेतल्यामुळे बरेच नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीची रिंगणात मतदानापूर्वीच भाजपने नगरसेवकांचे शतक पूर्ण केले आहे. याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे.



भाजपचे बिनविरोध जिंकलेले नगरसेवक – १००


भाजपचे बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष – ३


कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध?


- कोकण-४


- उत्तर महाराष्ट्र-४९


- पश्चिम महाराष्ट्र-४१


- मराठवाडा-३


- विदर्भ-३



दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचे २६ नगरसेवक बिनविरोध


धुळ्यातील दोंडाई नगरपालिकेत नगराध्यक्षसह भाजपचे एकूण सर्व २६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. राज्याच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदा घडला आहे.



जामनेर नगरपालिकेत भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध


जळगावच्या जामनेर नगरपालिकेतही भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून जामनेर नगरपालिकेवर भाजपची सत्ता असून यावर्षी देखील विरोधकांनी माघार घेतल्याने भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.



राज्यात २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. दरम्यान अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेमध्ये भाजपचे १०० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

Comments
Add Comment

Hinjawadi-Shivajinagar Metro: स्थानके अजूनही 'यार्डातच'; अपूर्ण कामांमुळे पुणेकरांच्या आशा मावळल्या

PUNE : हिंजवडी आयटी हबला दिलासा देण्यासाठी प्रस्तावित असलेला हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प गेल्या अनेक

JALGAON CRIME : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर दोन वर्षे अत्याचार; संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

JALGAON: लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या दोन वर्षांपासून जळगाव आणि धुळे परिसरात शारीरिक व

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घरभाडे भत्ताही वाढवणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच

Uri Blast : 'उरी'मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची गाडी अडकली! राज्यात उकाड्याचा कहर कायम; ‘या’ कारणामुळे पाऊस पुढे सरकेना

मुंबई : महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील