निवडणुकीपूर्वीच भाजपने उधळला विजयाचा गुलाल! २४६ नगरपरिषदांपैकी १०० जागांवर बिनविरोध कमळ फुलले

मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज देखील भरले आहेत. तर १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख होती. या दिवसात अनेक उमेदवारांनी अर्ज माघे घेतल्यामुळे बरेच नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीची रिंगणात मतदानापूर्वीच भाजपने नगरसेवकांचे शतक पूर्ण केले आहे. याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे.



भाजपचे बिनविरोध जिंकलेले नगरसेवक – १००


भाजपचे बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष – ३


कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध?


- कोकण-४


- उत्तर महाराष्ट्र-४९


- पश्चिम महाराष्ट्र-४१


- मराठवाडा-३


- विदर्भ-३



दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचे २६ नगरसेवक बिनविरोध


धुळ्यातील दोंडाई नगरपालिकेत नगराध्यक्षसह भाजपचे एकूण सर्व २६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. राज्याच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदा घडला आहे.



जामनेर नगरपालिकेत भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध


जळगावच्या जामनेर नगरपालिकेतही भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून जामनेर नगरपालिकेवर भाजपची सत्ता असून यावर्षी देखील विरोधकांनी माघार घेतल्याने भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.



राज्यात २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. दरम्यान अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेमध्ये भाजपचे १०० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली