दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. तुर्की आणि चीनमध्ये बनवलेल्या उच्च दर्जाच्या पिस्तूल पाकिस्तानमार्गे भारतात पुरवठा करण्यासाठी ही टोळी काम करत होती. महत्त्वाचे म्हणजे ही शस्त्रे पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये टाकली जात होती आणि नंतर पुन्हा विकली जात होती.


याप्रकरणात अजय, मनदीप, दलविंदर आणि रोहन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघेजण पंजाबचे आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले तेव्हा १० महागड्या परदेशी पिस्तूल आणि ९२ जिवंत काडतुसे जप्त केली. ज्याचा पुरवठा दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगार आणि गुंडांना केला जात होता.



गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की, हे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानी आयएसआयशी संबंधित व्यक्तींच्या इशाऱ्यावर कार्यरत होते. शस्त्रे प्रथम पाकिस्तानात नेली जात होती आणि नंतर तेथून भारतात तस्करी केली जात होती. या व्यक्तींनी आतापर्यंत भारतात किती शस्त्रे विकली आहेत आणि कोणत्या टोळ्यांना किंवा व्यक्तींना ती मिळाली आहेत याचा तपास पोलिस करत आहेत. शस्त्रे शोधण्यासाठी तपास यंत्रणा मोबाईल फोन, बँक तपशील आणि सोशल मीडियाचा वापर करत आहेत.


Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार