दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. तुर्की आणि चीनमध्ये बनवलेल्या उच्च दर्जाच्या पिस्तूल पाकिस्तानमार्गे भारतात पुरवठा करण्यासाठी ही टोळी काम करत होती. महत्त्वाचे म्हणजे ही शस्त्रे पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये टाकली जात होती आणि नंतर पुन्हा विकली जात होती.


याप्रकरणात अजय, मनदीप, दलविंदर आणि रोहन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघेजण पंजाबचे आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले तेव्हा १० महागड्या परदेशी पिस्तूल आणि ९२ जिवंत काडतुसे जप्त केली. ज्याचा पुरवठा दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगार आणि गुंडांना केला जात होता.



गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की, हे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानी आयएसआयशी संबंधित व्यक्तींच्या इशाऱ्यावर कार्यरत होते. शस्त्रे प्रथम पाकिस्तानात नेली जात होती आणि नंतर तेथून भारतात तस्करी केली जात होती. या व्यक्तींनी आतापर्यंत भारतात किती शस्त्रे विकली आहेत आणि कोणत्या टोळ्यांना किंवा व्यक्तींना ती मिळाली आहेत याचा तपास पोलिस करत आहेत. शस्त्रे शोधण्यासाठी तपास यंत्रणा मोबाईल फोन, बँक तपशील आणि सोशल मीडियाचा वापर करत आहेत.


Comments
Add Comment

Budget 2026 : करदात्यांना मोठा दिलासा! अपघात विम्याची रक्कम आता पूर्णपणे 'टॅक्स फ्री'; अर्थमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे.

Budget 2026 : करदात्यांना मोठा दिलासा! अपघात विम्याची रक्कम आता पूर्णपणे 'टॅक्स फ्री'; अर्थमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे.

Budget 2026 : देशातील प्रत्येक जिल्ह्यात उभारले जाणार 'गर्ल्स हॉस्टेल', ७ नवीन 'हाय-स्पीड कॉरिडॉर; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे.

Budget 2026 : निर्मला सीतारामन यांनी रचला इतिहास! सलग नवव्यांदा बजेट सादर करत मोडीत काढला 'हा' विक्रम

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण देशाचे लक्ष संसदेकडे लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला

Nirmala Sitharaman : ऐतिहासिक बजेटला कांजीवरमचा थाट! अर्थसंकल्पाआधीच निर्मला सीतारमण यांच्या साडीची पडली भुरळ...

नवी दिल्ली : आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आपला सलग नवा

‘जा-मर’ म्हणणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल कोची : दोन व्यक्तीच्या भांडणादरम्यान एकाने जा आणि मर यांसारखी विधाने करणे हे