दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. तुर्की आणि चीनमध्ये बनवलेल्या उच्च दर्जाच्या पिस्तूल पाकिस्तानमार्गे भारतात पुरवठा करण्यासाठी ही टोळी काम करत होती. महत्त्वाचे म्हणजे ही शस्त्रे पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये टाकली जात होती आणि नंतर पुन्हा विकली जात होती.


याप्रकरणात अजय, मनदीप, दलविंदर आणि रोहन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघेजण पंजाबचे आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले तेव्हा १० महागड्या परदेशी पिस्तूल आणि ९२ जिवंत काडतुसे जप्त केली. ज्याचा पुरवठा दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगार आणि गुंडांना केला जात होता.



गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की, हे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानी आयएसआयशी संबंधित व्यक्तींच्या इशाऱ्यावर कार्यरत होते. शस्त्रे प्रथम पाकिस्तानात नेली जात होती आणि नंतर तेथून भारतात तस्करी केली जात होती. या व्यक्तींनी आतापर्यंत भारतात किती शस्त्रे विकली आहेत आणि कोणत्या टोळ्यांना किंवा व्यक्तींना ती मिळाली आहेत याचा तपास पोलिस करत आहेत. शस्त्रे शोधण्यासाठी तपास यंत्रणा मोबाईल फोन, बँक तपशील आणि सोशल मीडियाचा वापर करत आहेत.


Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर ब्राझिल आणि चीनलाही इशारा पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज