पुण्यात म्हाडाची मोठी घोषणा; ४ हजारांहून अधिक घरांसाठी वाढीव मुदत

पुणे : पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ४,१८६ घरांसाठी आयोजित संगणकीय सोडतीच्या अर्जाची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक नागरिकांना ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.


या सोडतीसाठी आतापर्यंत तब्बल १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेच्या भरण्यासह नोंदवले गेले आहेत. संगणकीय सोडत ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता काढली जाणार आहे. अर्जदारांना ३० नोव्हेंबरपर्यंत RTGS अथवा NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करता येईल.


तांत्रिक अडचणींमुळे काही अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अपूर्ण राहिल्याने मुदतवाढ मागणी करण्यात आली होती. तसेच नागरिकांकडून आलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून म्हाडाने ही अंतिम मुदतवाढ जाहीर केली आहे. नव्या वेळापत्रकाची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. इतर अटी पूर्वी जाहीर केलेल्या जाहिरातीनुसारच राहणार आहेत, अशी माहिती पुणे मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली.


या सोडतीत चार प्रमुख गटांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत १६८३ घरांचा समावेश आहे, तर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत २९९ घरे उपलब्ध आहेत. १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत पीएमआरडीए हद्दीत ८६४ घरे देण्यात आली आहेत. तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्रातील ३२२२ घरांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :