शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी

गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी होत चालली आहे. फलंदाजीसाठी उतरल्यानंतर काहीच चेंडूत त्याची मान लचकली आणि वेदना वाढत गेल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले. उपचारासाठी ICU मध्ये दाखल करण्यात आलेल्या शुभमनला आता बरं वाटत असलं तरी दुसऱ्या कसोटीसाठी तो फिट नाही, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.भारतीय संघाच्या व्यावसायिक डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण दुखापतीमुळे शुभमन पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावातही मैदानात उतरू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.


सूत्रांच्या माहितीनुसार शुभमन गिलच्या जागी इंग्लंड दौऱ्यावर खेळलेला डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संघाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे जाणार असल्याचेही संकेत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. पहिली कसोटी हातातून गेल्यानंतर टीम इंडिया आता मालिकेत परतण्यासाठी दुसऱ्या कसोटीमध्ये कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड