उठाबशा काढायला सांगणाऱ्या शिक्षिकेला शिक्षा!

ममता यादववर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


वसई : उठाबशा काढण्यास सांगितल्यामुळे वसईच्या एका शाळेतील मुलीचा मृत्यू झाल्याची घटना वसईत शुक्रवारी घडली होती. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर उठाबशा काढण्यास सांगणाऱ्या शिक्षिकेविरोधात अखेर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिला अटक देखील करण्यात आली आहे.


श्री हनुमत विद्या मंदिर शाळेत इयत्ता सहावीमध्ये काजल (अंशिका) गौड ही वर्षीय मुलगी शिकत होती. ८ नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी शाळेत पोहोचण्यास तिला उशीर झाल्याने उठाबशा काढण्याची शिक्षा तिला दिली होती. मात्र शाळेतून घरी गेल्यानंतर तिची तब्येत खालावली. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबईच्या जे जे मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर हा गुन्हा वालिव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. उठाबशा काढण्यास सांगितल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता, तर त्याबाबतची तक्रार त्यांनी वालिव पोलीस ठाण्यात नोंदविल्यानंतर पोलिसांनी उठाबशा काढण्यास सांगितलेल्या शिक्षिका ममता यादव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून तिला अटक केल्याची माहिती वालिव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली.


काजल ही आधीच अशक्त होती. त्यातच तिला बॅगेचे ओझे खांद्यावर घेऊन १०० उठाबशा काढण्यास सांगितल्या. १०० उठाबशा काढण्याची क्षमता नसल्याची जाणीव असतानाही तिला शिक्षा दिल्याने तिची तब्येत खालावली आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याची फिर्याद तिच्या कुटुंबाने पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुलीच्या मृत्यू प्रकरणी तालुका आणि जिल्हा शिक्षण विभागातर्फे याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक

शेअर बाजारात प्री ओपन सत्रात सकारात्मक संकेत सेन्सेक्स ३०० व निफ्टी ७३ अंकाने उसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण:जागतिक पातळीवरील रॅलीचा फायदा आजही भारतात कायम राहू शकतो. प्री ओपन सत्रात सेन्सेक्स ३०० अंकांने व

लष्कर प्रमुखांचे विधान आणि पाकिस्तानचा उडाला थरकाप! म्हणाले, भारत कधीही घुसखोरी करू शकतो...

लाहोर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने

आधार कार्ड पुन्हा एकदा बदलणार

नाव असेल ना पत्ता, फोटोसोबत असेल क्युआर कोड नवी दिल्ली : सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

महिला राखीव जागेवर पुरुषाचे नामनिर्देशन अर्ज छाननीत वैध

मुंबई  : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातारा नगरपालिकेच्या प्रभाग