जवाद सिद्दिकीला १३ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली :  दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी अल फलाह विद्यापीठाचे प्रमुख व संस्थापक जवाद अहमद सिद्दिकी यांना १३ दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठवले आहे. केंद्रीय तपास संस्थेने दावा केला आहे की, जवाद यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची फसवणूक करून ४१५ कोटी कमावले आहेत. इतकंच नाही तर, त्यांच्या कुटुंबाचे आखाती देशांमध्ये संबंध असल्यामुळे ते पळून जाण्याची देखील शक्यता आहे.


सिद्दिकी व त्यांच्या नियंत्रणाखालील अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टने विद्यार्थी व पालकांना नॅक मान्यता व यूजीसीच्या ओळखपत्रांबद्दल खोटे दावे करून दिशाभूल केली आणि ४१५.१० कोटींची रक्कम गोळा केली. १० नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर हे विद्यापीठ तपासणीच्या कक्षेत आले. हा हल्ला करणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचे अनेक सदस्य अल फलाह विद्यापीठाशी संबंधित होते.


एजन्सीने दावा केला की, ट्रस्टने फसवणुकीच्या मार्गाने फी व शिक्षण शुल्काच्या नावाखाली ४१० कोटींहून अधिक रक्कम गोळा केली व ही रक्कम सिद्दिकी यांच्या वैयक्तिक व खासगी फायद्यासाठी वळवली.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन