मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ देणारा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबईच्या पुनर्विकास प्रक्रियेत अडकलेल्या भाडेकरूंना दीर्घकाळापासून भेडसावत असलेली नोंदणी शुल्काची अडचण दूर करण्यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे.


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर शासन आदेशाची प्रत शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला हा निर्णय जाहीर केला.


राज्य शासनाने जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार, मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात भाडेकरूंना मिळणाऱ्या नवीन घरांवर नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.


भाडेकरूंना ४०० ते ६०० चौरस फूटपर्यंत मिळणाऱ्या जागेवर नोंदणी फी आकारली जाणार नाही.


बांधकाम क्षेत्र २०० चौरस फूटांनी वाढले, तरीही शुल्क माफी लागू राहील.


महसूल विभागाने यासाठी औपचारिक परिपत्रक जारी केले असून मूल्य निर्धारणात कोणताही बदल होऊ नये, अशी स्पष्ट सूचना दिली आहे.





मुंबईत अनेक इमारती धोकादायक अवस्थेत असून पुनर्विकासाची प्रक्रिया वर्षानुवर्षे लांबते. अनेक वेळा नोंदणी शुल्काचा भार पेलता न आल्याने भाडेकरू पुनर्विकासात अडथळा ठरत होते.


नव्या धोरणामुळेभाडेकरूंच्या खिशावरचा ताण कमी होणार आहे. भाडेकरूंना आर्थिक दिलासा मिळेल, पुनर्विकास व्यवहार अधिक पारदर्शक होईल आणि बांधकाम प्रकल्पांना आवश्यक गती मिळेल. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येत असताना, शहरातील सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ देणारा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पुनर्विकासाच्या अडथळ्यांमुळे त्रस्त असलेल्या हजारो भाडेकरूंना हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे.

Comments
Add Comment

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक