मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ देणारा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबईच्या पुनर्विकास प्रक्रियेत अडकलेल्या भाडेकरूंना दीर्घकाळापासून भेडसावत असलेली नोंदणी शुल्काची अडचण दूर करण्यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे.


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर शासन आदेशाची प्रत शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला हा निर्णय जाहीर केला.


राज्य शासनाने जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार, मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात भाडेकरूंना मिळणाऱ्या नवीन घरांवर नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.


भाडेकरूंना ४०० ते ६०० चौरस फूटपर्यंत मिळणाऱ्या जागेवर नोंदणी फी आकारली जाणार नाही.


बांधकाम क्षेत्र २०० चौरस फूटांनी वाढले, तरीही शुल्क माफी लागू राहील.


महसूल विभागाने यासाठी औपचारिक परिपत्रक जारी केले असून मूल्य निर्धारणात कोणताही बदल होऊ नये, अशी स्पष्ट सूचना दिली आहे.





मुंबईत अनेक इमारती धोकादायक अवस्थेत असून पुनर्विकासाची प्रक्रिया वर्षानुवर्षे लांबते. अनेक वेळा नोंदणी शुल्काचा भार पेलता न आल्याने भाडेकरू पुनर्विकासात अडथळा ठरत होते.


नव्या धोरणामुळेभाडेकरूंच्या खिशावरचा ताण कमी होणार आहे. भाडेकरूंना आर्थिक दिलासा मिळेल, पुनर्विकास व्यवहार अधिक पारदर्शक होईल आणि बांधकाम प्रकल्पांना आवश्यक गती मिळेल. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येत असताना, शहरातील सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ देणारा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पुनर्विकासाच्या अडथळ्यांमुळे त्रस्त असलेल्या हजारो भाडेकरूंना हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली ! मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी

घरोघरी गाठीभेटींवर उमेदवारांचा भर!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या राजकीय तोफा अखेर मंगळवारी

मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज

२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि