लष्कर प्रमुखांचे विधान आणि पाकिस्तानचा उडाला थरकाप! म्हणाले, भारत कधीही घुसखोरी करू शकतो...

लाहोर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यानंतर झालेल्या दिल्ली बॉम्ब स्फोटामुळे भारत सरकार दहशतवादाला कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण यापूर्वीच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध सुरू होणार असल्याचे विधान केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लाल किल्ला बॉम्ब स्फोटाच्या प्रकरणात पाकिस्तानचे नाव समोर येत आहे. या हल्ल्याच्या सखोल तपासणीमधून लक्षात आले की, हा खूप मोठा घातपात होता. ज्याचे रॅकेट मोठे होते. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही असा इशारा दिला आहे.


दरम्यान, भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, " ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर होता आणि हा भाग ८८ तासांनंतर संपला. द्विवेदी यांनी स्पष्टपणे सांगितले की जर पाकिस्तानने आम्हाला संधी दिली तर भारत त्यांना एका जबाबदार राष्ट्राने आपल्या शेजाऱ्यांशी कसे वागावे याबद्दल धडा शिकवेल."





या पार्श्वभूमीवर, एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले की, "आम्ही भारताकडे दुर्लक्ष करत नाही. मी युद्ध किंवा भारताकडून कोणत्याही शत्रुत्वाच्या रणनीतीची शक्यता नाकारू शकत नाही. यामध्ये सीमापार घुसखोरी किंवा हल्ल्यांचा समावेश असू शकतो. त्यामुळे पाकिस्तानला पूर्णपणे सतर्क राहावे लागेल."


भारताचा सर्वात मोठा शत्रू देश असलेला पाकिस्तान सतत काहीना काही कुरघोड्या करत असतो. मात्र आता भारत कधीही दिल्ली हल्ल्याचे उत्तर देऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानच्या मनात निर्माण झाली असल्याचे आसिफ यांच्या विधानांवरून लक्षात येते.



Comments
Add Comment

Graduate Girl Kissed Crocodile Viral Post : थरारक! पदवी मिळाल्याच्या आनंदात तरुणीने केले १४ फुटी मगरीला 'KISS'; फोटोशूट जगभरात व्हायरल

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदवी मिळवण्याचा दिवस प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि खास असतो. या

Pakistan News : पाकिस्तानात दोन गटांमध्ये भीषण चकमक; १४ जण ठार, टीटीपी कमांडरचाही खात्मा

पाकिस्तान : पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात बुधवारी दोन सशस्त्र गटांमध्ये भीषण चकमक

Meta Layoffs 2026 : मेटामध्ये मोठी कर्मचारी कपात; तब्बल ८,००० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली!

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या ‘मेटा’ने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत

Iran - America War : “शांतता नाहीतर विनाश”; अमेरिकेची इराणला थेट युद्धाची चेतावणी, मध्यपूर्वेत तणाव वाढला

इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला आहे.

India - Italy Relations : भारत-इटली संबंधांना नवी उंची! २०२९ पर्यंत २२ अब्ज युरो व्यापाराचे लक्ष्य; ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’वर शिक्कामोर्तब

भारत आणि इटलीमधील संबंधांनी आता एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान

Iran - America War : इराणला आर्थिक धक्का; अमेरिकेने परकीय चलन नेटवर्कवर टाकला फास; परकीय चलन कंपनी आणि १९ जहाजांवर निर्बंध

अमेरिकेने इराणविरोधातील आर्थिक कारवाई आणखी तीव्र करत मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन प्रशासनाने नव्या