कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय




पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी पेटवत आहेत. मात्र थंडीच्या दिवसात पुणे पालिकेने शेकोटी न पेटवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वायू प्रदूषण होत असल्यामुले पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शेकोटी न पेटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कुणी शेकोटी पेटताना दिसल्यास संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई होईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.




पुणे पालिकेच्या निर्णयाबाबत सविस्तर


"पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिघांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या धूरामुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे. हवा प्रदूषणामुळे केवळ वातावरणामध्ये बदल होत नसून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहे. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड आणि अन्य हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो. ज्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे."



"केंद्र
आणि राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. जसे कि 'हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१' अंतर्गत भाग ४ कलम १९ (५), 'घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६' कलम १५ (छ) आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांचेकडील राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमच्या २०२२ च्या मार्गदर्शक तत्वांनुसार उघड्यावर कोळसा किंवा जैविक पदार्थ (प्लास्टिक / रबर) आणि इतर कचरा जाळण्यास मनाई केली आहे."




"यामुळे पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर मनपा कर्मचारी किंवा मनपा ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगारांना शेकोटी पेटवून उघड्यावर कोळसा / प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केल्याचे आढळल्यास पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. या पार्श्वभूमीवर कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील वॉचमन, फाई कामगार आणि इतर कामगार व्यक्तींनी या नियमांचे उल्लंघन करू नये असा आदेश पालिका आयुक्तांनी दिला आहे.




Comments
Add Comment

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर

येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार

नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण