कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय




पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी पेटवत आहेत. मात्र थंडीच्या दिवसात पुणे पालिकेने शेकोटी न पेटवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वायू प्रदूषण होत असल्यामुले पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शेकोटी न पेटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कुणी शेकोटी पेटताना दिसल्यास संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई होईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.




पुणे पालिकेच्या निर्णयाबाबत सविस्तर


"पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिघांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या धूरामुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे. हवा प्रदूषणामुळे केवळ वातावरणामध्ये बदल होत नसून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहे. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड आणि अन्य हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो. ज्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे."



"केंद्र
आणि राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. जसे कि 'हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१' अंतर्गत भाग ४ कलम १९ (५), 'घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६' कलम १५ (छ) आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांचेकडील राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमच्या २०२२ च्या मार्गदर्शक तत्वांनुसार उघड्यावर कोळसा किंवा जैविक पदार्थ (प्लास्टिक / रबर) आणि इतर कचरा जाळण्यास मनाई केली आहे."




"यामुळे पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर मनपा कर्मचारी किंवा मनपा ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगारांना शेकोटी पेटवून उघड्यावर कोळसा / प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केल्याचे आढळल्यास पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. या पार्श्वभूमीवर कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील वॉचमन, फाई कामगार आणि इतर कामगार व्यक्तींनी या नियमांचे उल्लंघन करू नये असा आदेश पालिका आयुक्तांनी दिला आहे.




Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी