देशातील २७२ मान्यवरांचे खुले पत्र, पत्रातून राहुल गांधींचा जाहीर निषेध

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची निवडणुकीतील पराभवाची रेषा सातत्याने खाली उतरते आहे. विविध प्रयत्नांनंतरही काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी वोटचोरीचा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपांवर देशभरातील बुद्धीवंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर २७२ नामवंत विचारवंतांनी एक खुलं पत्र लिहित, राहुल गांधी यांच्या आरोपांवर कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पत्रात, बुद्धीवंतांनी म्हटले आहे की, "आम्ही भारतीय लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे चिंतित आहोत." त्यांनी असेही सांगितले की, "राजकीय मंडळी लोकांचे मन भडकवण्याऐवजी तथ्यहीन आरोप करून फुकटचे राजकारण करत आहेत."


या पत्रामध्ये बुद्धीवंतांनी निवडणूक आयोगावर झालेल्या आरोपांवर आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, "आता निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेवर आरोप करून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे." याशिवाय, भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल शंका उपस्थित करणे, न्यायव्यवस्थेची निष्पक्षता आणि संसद व घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींविषयी शंका घेणे हे लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. बुद्धीवंतांनी निवडणूक आयोगाच्या इमानदारीची आणि प्रतिष्ठेची वकिली केली असून, संस्थेने षडयंत्रकारकांच्या विरोधात तडजोड न करता आपली इमाने आणि प्रतिष्ठा जपणे आवश्यक असल्याचे सांगितले.


सामाजिक आणि राजकीय असंतोषाचा सामना करत असताना, याप्रकारचे आरोप देशाच्या राजकीय व लोकशाही प्रक्रियेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात, असे बुद्धीवंतांचे मत आहे.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन