देशातील २७२ मान्यवरांचे खुले पत्र, पत्रातून राहुल गांधींचा जाहीर निषेध

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची निवडणुकीतील पराभवाची रेषा सातत्याने खाली उतरते आहे. विविध प्रयत्नांनंतरही काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी वोटचोरीचा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपांवर देशभरातील बुद्धीवंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर २७२ नामवंत विचारवंतांनी एक खुलं पत्र लिहित, राहुल गांधी यांच्या आरोपांवर कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पत्रात, बुद्धीवंतांनी म्हटले आहे की, "आम्ही भारतीय लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे चिंतित आहोत." त्यांनी असेही सांगितले की, "राजकीय मंडळी लोकांचे मन भडकवण्याऐवजी तथ्यहीन आरोप करून फुकटचे राजकारण करत आहेत."


या पत्रामध्ये बुद्धीवंतांनी निवडणूक आयोगावर झालेल्या आरोपांवर आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, "आता निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेवर आरोप करून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे." याशिवाय, भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल शंका उपस्थित करणे, न्यायव्यवस्थेची निष्पक्षता आणि संसद व घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींविषयी शंका घेणे हे लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. बुद्धीवंतांनी निवडणूक आयोगाच्या इमानदारीची आणि प्रतिष्ठेची वकिली केली असून, संस्थेने षडयंत्रकारकांच्या विरोधात तडजोड न करता आपली इमाने आणि प्रतिष्ठा जपणे आवश्यक असल्याचे सांगितले.


सामाजिक आणि राजकीय असंतोषाचा सामना करत असताना, याप्रकारचे आरोप देशाच्या राजकीय व लोकशाही प्रक्रियेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात, असे बुद्धीवंतांचे मत आहे.

Comments
Add Comment

देशातील क्रमांक दोन आयटी कंपनीचा तिमाही निकाल जाहीर इन्फोसिसच्या निव्वळ नफ्यात २% घसरण

मोहित सोमण: इन्फोसिस कंपनीने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार,

Devendra Fadnavis : परप्रांतियांना थोबाडीत मारणं म्हणजे मुंबईचा विकास नव्हे; मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर बोचरा वार

वरळीच्या बीडीडी चाळीतून भरला प्रचाराचा हुंकार मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा

शेअर बाजारात 'कंसोलिडेशन' मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सेन्सेक्स २४४.९८ अंकाने व निफ्टी ६६.७० कोसळला!

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेच्या फटक्यामुळे आजही शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्यामुळे अखेरच्या सत्रात सेन्सेक्स

क्वाड्रंट फ्युचर टेक शेअरमध्ये ९% वाढ 'या' कारणामुळे तरीही शेअर विकण्याचा तज्ञांचा सल्ला!

मोहित सोमण: क्वाड्रंट फ्युचर टेक शेअर्समध्ये आज तुफान वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर इंट्राडे ९% पातळीवर उसळला असून

सोन्याचांदीत 'हाहाःकार' सोने १ दिवसात प्रति तोळा १०९० रूपयांने तर चांदी १५००० उसळत २९०००० प्रति किलोवर

मोहित सोमण: सलग चौथ्यांदा सोन्यातचांदीत हाहाःकार निर्माण झाला आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीवरील

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात