देशातील २७२ मान्यवरांचे खुले पत्र, पत्रातून राहुल गांधींचा जाहीर निषेध

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची निवडणुकीतील पराभवाची रेषा सातत्याने खाली उतरते आहे. विविध प्रयत्नांनंतरही काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी वोटचोरीचा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपांवर देशभरातील बुद्धीवंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर २७२ नामवंत विचारवंतांनी एक खुलं पत्र लिहित, राहुल गांधी यांच्या आरोपांवर कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पत्रात, बुद्धीवंतांनी म्हटले आहे की, "आम्ही भारतीय लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे चिंतित आहोत." त्यांनी असेही सांगितले की, "राजकीय मंडळी लोकांचे मन भडकवण्याऐवजी तथ्यहीन आरोप करून फुकटचे राजकारण करत आहेत."


या पत्रामध्ये बुद्धीवंतांनी निवडणूक आयोगावर झालेल्या आरोपांवर आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, "आता निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेवर आरोप करून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे." याशिवाय, भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल शंका उपस्थित करणे, न्यायव्यवस्थेची निष्पक्षता आणि संसद व घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींविषयी शंका घेणे हे लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. बुद्धीवंतांनी निवडणूक आयोगाच्या इमानदारीची आणि प्रतिष्ठेची वकिली केली असून, संस्थेने षडयंत्रकारकांच्या विरोधात तडजोड न करता आपली इमाने आणि प्रतिष्ठा जपणे आवश्यक असल्याचे सांगितले.


सामाजिक आणि राजकीय असंतोषाचा सामना करत असताना, याप्रकारचे आरोप देशाच्या राजकीय व लोकशाही प्रक्रियेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात, असे बुद्धीवंतांचे मत आहे.

Comments
Add Comment

मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर जन्मलेले बाळ झाले 'नैसर्गिकरित्या बरे'.

मुंबई : राम मंदिर स्टेशनवर जन्मलेल्या बाळाची तब्येत जन्मानंतर काही तासांत खालावली होती. पण वेळेत उपचार

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस

Gold Silver Rate Today: अखेर ४ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्यात व सलग दुसऱ्यांदा चांदीत वाढ का होत आहे ? 'हे' आहेत आजचे दर

मोहित सोमण: गेले ४ दिवस घसरणीला ब्रेक लागला असून आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने आज

सम्राट चौधरींना 'मोठा माणूस' म्हणून संबोधून भाजपने खेळली नवी खेळी

बिहार : बिहार निवडणुकीत सम्राट चौधरी यांच्यावर लावण्यात आलेल्या असंख्य आरोपांनंतरही भाजपने त्यांच्यावर

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

मुंबईतील चारकोप परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार, एक जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील चारकोप परिसरात आज दुपारी २ वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला