Vasai News : 'मामा माझ्याशी लग्न कर', भाचीचा तगादा जीवावर! आईच्या सख्ख्या भावासोबतचं अफेअर; लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादाचा भयावह शेवट

मुंबई : वसईतील सातवली परिसरात अपहरण झालेल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाचीसोबत प्रेमसंबंध असलेल्या मामानेच तिचा जीव घेतल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी मामाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुंबईजवळील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील प्रेमसंबंधांचा आणि नात्याचा तपशील समोर आल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेली पूजा हिचे तिच्या सख्ख्या मामासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधातून पूजा मामासोबत लग्न करण्यासाठी सतत तगादा लावत असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. अपहरण की पलायन? या लग्नावरून दोघांमध्ये अनेक वेळा वादही झाल्याची माहिती समोर आली आहे. पूजा घरातून बेपत्ता झाल्यानंतर, १६ नोव्हेंबर रोजी तिच्या आईने वळीव पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली. पूजा घरातून अचानक बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर घटनेची नोंद होताच वळीव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. प्रेमसंबंध आणि त्यानंतर लग्नावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत असून, तरुणीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.



भाईंदर-वसई दरम्यान वेगात असलेल्या लोकल ट्रेनमधून भाचीला ढकलले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी, पूजा, शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी आपले घर सोडून वसईच्या वालीव गावराई पाडा परिसरात सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या आपल्या मामाकडे आली होती. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी मामा आणि भाची चर्चगेट–विरार फास्ट लोकलमध्ये एकत्र प्रवास करत होते. भाईंदर आणि वसई यांच्या दरम्यान गाडी वेगात असताना दोघांमध्ये लग्नावरून तीव्र वाद झाला. या वादाचा शेवट अत्यंत भयावह ठरला, आरोपी मामा याने भाचीला अचानक ट्रेनमधून ढकलून दिले. खाली पडून पूजा जागीच ठार झाली. या घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या काही सावध प्रवाशांनी तत्काळ आरोपी मामाला पकडले आणि त्याला वसई रोड रेल्वे पोलिसांच्या (GRP) ताब्यात दिले. पूजा बेपत्ता असल्याने तिच्या आईने वालीव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे, रेल्वे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी आरोपी मामाला वालीव पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून घडलेल्या या क्रूर कृत्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

देशातील २७२ मान्यवरांचे खुले पत्र, पत्रातून राहुल गांधींचा जाहीर निषेध

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची निवडणुकीतील पराभवाची रेषा सातत्याने खाली उतरते आहे.

Gold Silver Rate Today: अखेर ४ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्यात व सलग दुसऱ्यांदा चांदीत वाढ का होत आहे ? 'हे' आहेत आजचे दर

मोहित सोमण: गेले ४ दिवस घसरणीला ब्रेक लागला असून आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने आज

सम्राट चौधरींना 'मोठा माणूस' म्हणून संबोधून भाजपने खेळली नवी खेळी

बिहार : बिहार निवडणुकीत सम्राट चौधरी यांच्यावर लावण्यात आलेल्या असंख्य आरोपांनंतरही भाजपने त्यांच्यावर

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

मुंबईतील चारकोप परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार, एक जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील चारकोप परिसरात आज दुपारी २ वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला

राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार; शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढणार?

सुजय विखे पाटील यांनी जागा देऊनही शिवसेना-भाजपने आम्हाला डावलले - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल