उत्पन्नवाढीसाठी परिवहन महामंडळ सुरू करणार २५१ पेट्रोल पंप

सीएनजी, पेट्रोल व डिझेलची करणार विक्री


निविदा प्रक्रियेला वेग, ७० वर्षे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून इंधन खरेदी,  सामान्य ग्राहकालाही मिळणार इंधन


मुंबई  : राज्य परिवहन महामंडळाकडून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यासाठी महामंडळ व्यवस्थापनाने राज्यातील विविध २५१ ठिकाणी सीएनजीसह पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडण्यास मदत होणार आहे. व्यवस्थापनाकडून निविदा प्रक्रियाही राबवण्याची प्रक्रियेला वेग आले आहे.


परिवहन महामंडळाने उत्पन्न वाढीचाच एक भाग म्हणून पुढील काळात पेट्रोल, डिझेल पंप सुरू करत त्याच्या विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासाठीची प्रक्रिया आता सुरू केली आहे. उत्पन्नाचा नवा मार्ग निर्माण करण्याच्याच उद्देशाने महामंडळाच्या मालकीच्या जागेवर २५१ पेक्षा अधिक ठिकाणी हे पंप उभारले जाणार आहेत.व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेल यासह सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू केला जाणार आहे.


महामंडळाने व्यावसायिक तत्त्वावर समुदाय इंधन विक्री केंद्र उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया देखील सुरू केली आहे. ज्या ठिकाणी महामंडळाच्या बससाठी इंधन भरले जाते, तिथेच सामान्य ग्राहकालाही किरकोळ पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची विक्री करणे शक्य होईल. ७० वर्षांहून जास्त वर्षे परिवहन महामंडळ इंडियन ऑईलसह हिंदुस्तान व भारत पेट्रोलियम आदी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु