गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे गुवाहाटी येथील कसोटी सामना भारतासाठी ‘करो किंवा मरो’ अशा स्वरुपाचा आहे. या पार्श्वभूमीवर कोलकातातील एक वेगळीच घटना चर्चेचा विषय ठरली आहे.



दक्षिण आफ्रिकन खेळाडूंची रात्री वैद्यकीय तपासणी


पहिला कसोटी सामना संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघातील काही प्रमुख खेळाडूंनी रात्री उशीरा कोलकातातील वुड्सलँड्स रुग्णालयात तपासणीसाठी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या आरोग्य तपासणीमुळे क्रिकेटविश्वात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, याच रुग्णालयात भारतीय फलंदाज शुभमन गिलदेखील दाखल होता आणि काल सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.



नियमित तपासणी की इतर कारण ?


भारतीय हवामानात मॅच खेळल्यानंतर किंवा सततच्या प्रवासानंतर खेळाडूंची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यामुळे हे फक्त रुटीन चेकअप असण्याची शक्यता आहे. मात्र, आफ्रिकन खेळाडू रुग्णालयात का आले होते याचे अधिकृत कारण अद्याप समजलेले नाही. वैद्यकीय तपासणीनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुवाहाटीला रवाना होणार असल्याचे कळते.


भारतीय संघ सध्या कोलकात्यातच सरावात व्यस्त आहे. पुढील सामन्यासाठी पर्यायी संघरचना तपासली जात आहे. शुभमन गिल अद्याप पूर्ण तंदुरुस्त नसल्याने साई सुदर्शन आणि देवदत्त पडीक्कल या दोघांकडे प्रशिक्षक गौतम गंभीर विशेष लक्ष देताना दिसत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारत पुन्हा एकदा डावखुऱ्या फलंदाजांच्या संख्येवर भर देणार का, याबाबत उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन