गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे गुवाहाटी येथील कसोटी सामना भारतासाठी ‘करो किंवा मरो’ अशा स्वरुपाचा आहे. या पार्श्वभूमीवर कोलकातातील एक वेगळीच घटना चर्चेचा विषय ठरली आहे.



दक्षिण आफ्रिकन खेळाडूंची रात्री वैद्यकीय तपासणी


पहिला कसोटी सामना संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघातील काही प्रमुख खेळाडूंनी रात्री उशीरा कोलकातातील वुड्सलँड्स रुग्णालयात तपासणीसाठी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या आरोग्य तपासणीमुळे क्रिकेटविश्वात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, याच रुग्णालयात भारतीय फलंदाज शुभमन गिलदेखील दाखल होता आणि काल सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.



नियमित तपासणी की इतर कारण ?


भारतीय हवामानात मॅच खेळल्यानंतर किंवा सततच्या प्रवासानंतर खेळाडूंची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यामुळे हे फक्त रुटीन चेकअप असण्याची शक्यता आहे. मात्र, आफ्रिकन खेळाडू रुग्णालयात का आले होते याचे अधिकृत कारण अद्याप समजलेले नाही. वैद्यकीय तपासणीनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुवाहाटीला रवाना होणार असल्याचे कळते.


भारतीय संघ सध्या कोलकात्यातच सरावात व्यस्त आहे. पुढील सामन्यासाठी पर्यायी संघरचना तपासली जात आहे. शुभमन गिल अद्याप पूर्ण तंदुरुस्त नसल्याने साई सुदर्शन आणि देवदत्त पडीक्कल या दोघांकडे प्रशिक्षक गौतम गंभीर विशेष लक्ष देताना दिसत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारत पुन्हा एकदा डावखुऱ्या फलंदाजांच्या संख्येवर भर देणार का, याबाबत उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.