इलेक्ट्रिक एसटी बसला राज्यातील द्रुतगती मार्गांवर टोलमाफी

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याचा ई-शिवाई बसला फायदा


मुंबई  : राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसला द्रुतगती महामार्गांवर टोलमाफी द्यावी, अशी सातत्याने होत असलेली मागणी अखेर मार्गी लागली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या काही महिन्यांपासून यासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला असून आता राज्यातील सर्व इलेक्ट्रिक एसटी बसला द्रुतगती महामार्गांवर १०० टक्के टोलमाफी लागू करण्यात आली आहे.


या निर्णयाचा फायदा नाशिक-मुंबई मार्गावरील ई-शिवाई बस सेवेवर होणार आहे. या निर्णयानंतर ई-शिवाई बस समृद्धी महामार्गावरून धावू शकणार आहे. जुन्या महामार्गावरील कोंडी, टोल प्लाझांवरील विलंब टळणार आहे.


मंत्री भुजबळ यांनी ३ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ ’ जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० या कालावधीत खासगी, सरकारी व निमसरकारी अशा सर्व ई-वाहनांना टोलमाफी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.


प्रवाशांना होणारे प्रत्यक्ष फायदे




  1. नाशिक–मुंबई दरम्यानच्या प्रवाशांवर या निर्णयाचा स्पष्ट आणि मोठा परिणाम दिसणार आहे.

  2. जुन्या महामार्गावरून प्रवास करताना साधारण ४.५ तास लागत होते.

  3. समृद्धी महामार्गाचा वापर केल्यास प्रवासाचा वेळ तासाभराने कमी होऊन फक्त ३.५ तास लागतील.

  4. वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.

  5. प्रवास अधिक सुरळीत आणि आरामदायी बनेल.

  6. एसटी महामंडळाची वार्षिक कोट्यवधी रुपयांची टोलची बचत होईल.


संपूर्ण राज्यात इलेक्ट्रिक बस वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार


मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई–शिर्डी मार्ग, अटल सेतू (शिवडी–न्हावा शेवा), मुंबई–छत्रपती संभाजीनगर, मुंबई–नागपूर, नाशिक–छत्रपती संभाजीनगर, नाशिक–नागपूर या मार्गांवर भविष्यात ई-बसेस सुरू झाल्यानंतर त्यांनाही टोलमाफी लागू होणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात इलेक्ट्रिक बस वाहतुकीला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

Comments
Add Comment

पुण्याच्या आरुषची गगनभरारी, १० व्या वर्षी अवकाशाला गवसणी

पुणे : हल्लीची मुलं ही मुळातच हुशार असतात. लहानग्या वयातच त्यांचा पंखात असणारं बळ हे प्रचंड असतं. थोडक्यात काय तर

Kolhapur Accident : ब्रेकिंग! कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात भरधाव क्रेटाने दुचाकीला चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू मिल चौकात (Kolhapur Accident)

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत

Ladki Bahin Yojana e-KYC: बहिणींसाठी आनंदवार्ता! 'या' दिवसापर्यंत आता करता येणार ई-केवायसी

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्या लाडक्या

Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार!

महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईचा महापौर कोण याबाबत

ZP and Panchayat Samiti Elections 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी ७,४३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेला निवडणुकांचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकसभा,