बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग !

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ आणि इतर रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर घर करणाऱ्या अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोरेगाव याठिकाणी कोलते पाटील व्हर्व्ह या बिल्डिंगमधील त्याच्या निवासस्थानात लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


सुदैवाने, घटनेच्या वेळी घरात कोणीही नव्हते त्यामुळे या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाच्या तत्पर प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी केलेली मेहनत दिसून येत आहे.


शिव ठाकरेच्या टीमने या प्रकरणी अधिकृत निवेदनाद्वारे माहिती दिली आहे की, “आज सकाळी मुंबईतील कोलते पाटील व्हेर्व्ह इमारतीतील शिव ठाकरे यांच्या घराला आग लागली. या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही, परंतु घरातील काही सामग्री मोठ्या प्रमाणात जळून नष्ट झाल्या आहेत. अभिनेत्याचे कुटुंब सुरक्षित आहे.”


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अद्याप शिवने स्वतः सोशल मीडियाद्वारे या घटनेबाबत कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.


मूळ अमरावतीचा असलेला शिव ठाकरे ‘एमटीव्ही रोडीज रायजिंग’, ‘बिग बॉस मराठी २’, ‘बिग बॉस १६’, ‘झलक दिखला जा ११’, ‘खतरों के खिलाड़ी १३’ या रिऍलीटी शोमधून लोकप्रिय झाला. मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात त्याने वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलिकडे त्याने मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले होते, ज्याची माहिती त्याने ‘झलक दिखला जा’ शो दरम्यान चाहत्यांसोबत शेअर केली होती.

Comments
Add Comment

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जान

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी,

नदीजोड प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा -ना.विखे पाटील

कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा घेतला आढावा मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे

गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक; हरित आणि इंधन बचतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार

इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेने विशेष कर्ज योजना आणावी - मंत्री नितेश राणे इलेक्ट्रिक बोटिंसाठी मुंबई बँक

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Water Shortage : राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई

६३३ गावे, १ हजार ६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे

महाराष्ट्रात होणार २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती

६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक; १ लाख २३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध होणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी