शिउबाठाला मोठे खिंडार! नाशिकच्या अद्वय हिरेंची घरवापसी, भाजपच्या मुंबईतील कार्यालयात होणार पक्षप्रवेश

नाशिक: महाराष्ट्राच्या राजकारणात आज अजून एक पक्षांतर होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर झाल्यामुळे पक्षांतराला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचे भाजपमध्ये पक्षांतर करणार असल्याचे निश्चित झाले आहे. अद्वय हिरे यांच्या भाजप एन्ट्रीमुळे ठाकरेंच्या गटाला नाशिकमध्ये खिंडार पडले आहे. हिरे यांचा पक्षप्रवेश आज  भाजपच्या मुंबईतील कार्यालयात होणार आहे.


नाशिकच्या राजकारणात हिरे कुटुंबियांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या मालेगावात हिरे कुटुंबियांची ताकद जास्त आहे. त्यामुळे आगामी नगर पंचायत, नगर परिषद निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या गटाचे मोठे नुकसान झाले आहे. याउलट अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची नाशिक जिल्ह्यात मोठी ताकद वाढणार आहे. अद्वय हिरेंसोबतच अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेळके यांच्याही भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.




मुळात हिरे पहिले भाजपमध्येच होते. मात्र मधल्या काळात त्यांनी भाजपातून ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. पण विधानसभेवेळी मंत्री दादा भुसे यांचे आव्हान त्यांच्यासमोर असल्याने त्यांचा पराभव झाला होता. तसेच भाजपचा बिहारमधील विजयसुद्धा त्यांच्या भाजप प्रवेशासाठी महत्त्वाचा ठरला असल्याची शक्यता आहे.


नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा काल (१७ नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. आजपासून प्रत्येक पक्ष खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फोडणार आहे.


Comments
Add Comment

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार मुंबई : महिलांवरील हिंसाचार,