वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल


वैभववाडी : वैभववाडी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून उबाठाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे भाजपाने वैभववाडीमध्ये आपली ताकद आणखी वाढवली आहे.


या कार्यक्रमात उबाठाचे आखवणे शाखाप्रमुख रवींद्र गुरव, भोम शाखाप्रमुख संतोष नारायण पडवळ, महिला शाखाप्रमुख संजीवनी गुरव, तसेच राजेश गुरव, संदीप पाटेकर, मंगेश गुरव, संदीप गुरव आणि अन्य अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री नितेश राणे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. या प्रवेशामुळे उबाठाला मोठा धक्का बसला असून भाजपासाठी हा महत्त्वाचा राजकीय विजय मानला जात आहे.


कार्यक्रमावेळी किशोर कांबळे, श्रीधर फोंडके, ज्ञानेश्वर फोंडके, सुशील कदम, उदय पांचाळ, शांतिनाथ गुरव यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या घडामोडीमुळे वैभववाडीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून आगामी काळात भाजपाची ताकद अधिक बळकट होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात दोन अर्ज बाद ठरल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. गुरुवारी

इंधन तुटवड्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गांधी परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी देशाची बदनामी थांबवावी मुंबई : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या

आयएएस अधिकारी देवेंद्र सिंह यांचे निलंबन मागे

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

हुंडाबंदी कायदा अधिक कठोर होणार, राज्यमंत्री पंकज भोयरांनी दिली ग्वाही

मुंबई : गेल्या काही वर्षांत राज्यात घडलेल्या हुंडाबळी प्रकरणांचा मुद्दा सोमवारी विधानसभेत चांगलाच गाजला.

​नवापूर जमीन घोटाळ्याचे 'रॅकेट' फोडणार, बावनकुळेंचे आश्वासन

तलाठ्यापासून वरपर्यंत सर्वांची 'एसआयटी' चौकशी; महसूलमंत्री बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा मुंबई : नंदूरबार

भारतीय संघाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींसह राजकीय नेत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

मुंबई: भारतीय क्रिकेट संघानं २०२६ च्या आयसीसी पुरुष टी-२०विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी केली. अहमदाबाद इथं