वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल


वैभववाडी : वैभववाडी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून उबाठाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे भाजपाने वैभववाडीमध्ये आपली ताकद आणखी वाढवली आहे.


या कार्यक्रमात उबाठाचे आखवणे शाखाप्रमुख रवींद्र गुरव, भोम शाखाप्रमुख संतोष नारायण पडवळ, महिला शाखाप्रमुख संजीवनी गुरव, तसेच राजेश गुरव, संदीप पाटेकर, मंगेश गुरव, संदीप गुरव आणि अन्य अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री नितेश राणे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. या प्रवेशामुळे उबाठाला मोठा धक्का बसला असून भाजपासाठी हा महत्त्वाचा राजकीय विजय मानला जात आहे.


कार्यक्रमावेळी किशोर कांबळे, श्रीधर फोंडके, ज्ञानेश्वर फोंडके, सुशील कदम, उदय पांचाळ, शांतिनाथ गुरव यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या घडामोडीमुळे वैभववाडीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून आगामी काळात भाजपाची ताकद अधिक बळकट होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

फलटण नगरपालिका निवडणुकीत पुन्हा ‘नाईक निंबाळकर’ विरुद्ध ‘नाईक निंबाळकर’ सामना; अर्ज भरतीच्या शेवटच्या दिवशी मोठा राजकीय ट्विस्ट

फलटण : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी उडाली असून अनेक ठिकाणी नवी समीकरणे, नवी

महायुतीची शक्यता तपासा, पण मित्रपक्षांशी लढाई नको, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्थानिक नेत्यांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील भाजपच्या नव्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री

नागपुरात शिवसेना स्वबळावर लढणार, भाजपचे सूचक मौन!

नागपूर : नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकत्यांनी जीवाचे रान केल्यानंतर आता कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची

गडचिरोलीत नगराध्यक्षपदाचा सामना ठरला, प्रणोती निंबोरकर विरुद्ध कविता पोरेड्डीवार आमनेसामने

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील तीन नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वेग

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

मुंबईत उद्धव समर्थक आणि भाजपचे एकमेकांविरोधात बॅनरयुद्ध

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला. यानंतर भाजपचे मिशन मुंबई लगेच सुरू झाले आहे. बिहारमध्ये