जामनेर नगराध्यक्षपदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन निवडणुकीच्या रिंगणात!

जामनेर : राज्यातील तब्बल २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे त्याच अनुशंघाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.


जामनेरच्या नगराध्यक्ष पदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच भाजपच्या उमेदवार साधना महाजन यांनी आज कार्यकर्त्यां समवेत शक्ती प्रदर्शन करत मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी संवाद करतेवेळी शहरात आम्ही अनेक विकास कामे केली आहेत तसेच अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी आम्हाला पुन्हा जनतेने संधी दिली की, सगळी कामे आम्ही त्वरित पूर्ण करू. तसेच विरोधकांची आव्हाने आम्ही पेलवणार कारण आमच्याकडे विकासाचे मुद्दे आहेत तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने उत्तम नेतृत्व आहे. त्यांच्या मार्फत शहराचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न करू असे आश्वासनही दिले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि