२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो आणि अकासा विमानसेवा सुरू

मुंबई : २५ डिसेंबर रोजी नवी मुंबईच्या विमान तळावरून प्रत्यक्षात पहिले व्यवसायिक विमान उड्डाण घेणार आहे. शिवाय प्रत्यक्ष उड्डाणासाठी तिकीट नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ही बाब विमान प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. इंडिगोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणांसाठी सविस्तर योजना जाहीर केली आहे. २५ डिसेंबरपासून, इंडिगो नवी मुंबई विमानतळावरून देशभरातील १० शहरांमध्ये उड्डाणे चालवेल. यामध्ये दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद, अहमदाबाद, लखनऊ, उत्तर गोवा (मोपा), जयपूर, नागपूर, कोची आणि मंगलोर यांचा समावेश आहे. एअरलाइन हळूहळू इतर शहरांमध्ये उड्डाणे वाढवण्याची योजना
आखत आहे.


एअर इंडियाने नवी मुंबईवरून चालणाऱ्या उड्डाणांसाठी आधीच सविस्तर योजना जाहीर केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, एअर इंडिया २० डेली फ्लाइट्स (४० एटीएम) चालवत आहे. अकासा एअरची चार शहरांसाठी थेट फ्लाइट्स: अकासा एअर २५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून थेट चार भारतीय शहरांना जोडेल. एअरलाइन पहिल्या दिवशी दिल्ली आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान पहिली फ्लाइट चालवेल. नवी मुंबईहून गोवा, कोची आणि अहमदाबादलाही फ्लाइट्स चालवल्या जातील. बुकिंग आधीच सुरू झाले आहे.

Comments
Add Comment

श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त उरुळी स्थानकावर १६ गाड्यांना तात्पुरता थांबा

उरुळी : जून २०२६ मध्ये उरुळी येथे होणाऱ्या श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त

MLC Election : विधानपरिषदेच्या १५ जागांवर भाजप वरचढ

 शिवसेना-राष्ट्रवादीकडे केवळ एकेका जागेवर बहुमत; पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत मोठी चढाओढ मुंबई : विधानपरिषदेच्या

Shiv Thakare :शिव ठाकरेचे मुंबईतील घर पाहिले का? ‘या’ गोष्टींनी वेधले लक्ष

Shiv Thakare Home Tour: फराह खानने बॉलीवूडमध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ती अनेक

Yash Dayal : हा माझा निर्णय नव्हता; यश दयालच्या वक्तव्यानं खळबळ, RCB व्यवस्थापनावर अप्रत्यक्ष सवाल

IPL 2026 :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) वेगवान गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ च्या संपूर्ण

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला