'भाजप काँग्रेसचा सर्वाधिक आमदारांचा विक्रम मोडणार'

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे. भाजपला मिळालेल्या आमदारांची ही आतापर्यंतची मोठी संख्या आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या जागा जिंकून भाजपने आपले स्थान सातत्याने मजबूत केले आहे. पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये भाजपच्या चढत्या आलेखाबद्दल माहिती दिली. पुढील दोन वर्षांत भाजपच्या देशभरातील आमदारांची एकूण संख्या १८०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे, असा विश्वास अमित मालवीय यांनी व्यक्त केला.

देशात इंदिरा गांधींची लाट होती त्या काळात १९८५ मध्ये काँग्रेसने २०१८ आमदारांचा टप्पा गाठला होता. ही देशातल्या काँग्रेस आमदारांची सर्वोच्च संख्या होती. हा विक्रम एक दिवस भारतीय जनता पार्टी नक्की मोडीत काढेल, असाही विश्वास अमित मालवीय यांनी व्यक्त केला.



 

भाजप आमदारांची संख्या कशी वाढली ?

भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या संख्येत २०१४ पासून वाढ होत आहे. या संदर्भातली आकडेवारी भाजपच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे. भाजप आमदारांची संख्या २०१४ मध्ये १,०३५ होती. नंतर २०१५ मध्ये ९९७, २०१६ मध्ये १,०५३ आणि २०१७ मध्ये १,३६५ अशी लक्षणीय वाढ झाली. त्यानंतर २०१८ मध्ये ही संख्या १,१८४, २०१९ मध्ये १,१६० आणि २०२० मध्ये १,२०७ झाली. यानंतर २०२१ मध्ये १,२७८ आमदार, २०२२ मध्ये १,२८९, २०२३ मध्ये १,४४१, २०२४ मध्ये १,५८८ आणि आता २०२५ मध्ये १,६५४ आमदारांसह वाढीचा कल कायम आहे
Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली