ट्रान्सजेंडर गँगने अपहरण करुन सुरतला नेले आणि शस्त्रक्रियेद्वारे केला लिंगबदल, तरुणाचा आरोप


मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरातून ट्रान्सजेंडर गँगने अपहरण केले आणि जबरदस्तीने सुरतला नेले, तिथे शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला. यानंतर मुद्दाम भिक्षा मागण्याची सक्ती केली आणि भिक्षेतून मिळालेले पैसे लुबाडून बेदम मारहाण केली. या प्रकाराने हादरलेला तरुण संधी मिळताच पळाला आणि मुंबईत परतला. मुंबईत येताच तरुणाने मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यात ट्रान्सजेंडर गँग विरोधात अपहरण करणे, जबरदस्ती करणे, बेदम मारहाण करणे, विना संमती जबरदस्तीने लिंगबदल शस्त्रक्रिया करणे, पैसे लुबाडणे अशा विविध आरोपांतर्गत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार येताच ट्रान्सजेंडर गँग विरोधात गुन्हा नोंदवला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि चार जणांना अटक केली. आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे.


ट्रान्सजेंडर गँगने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी अपहरण केले आणि जबरदस्तीने सुरतला नेले, तिथे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला; असा आरोप पीडित तरुणाने केला आहे. पीडित तरुण १९ वर्षांचा आहे. यामुळे तक्रार येताच पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि तातडीने तपास सुरू केल. आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून उर्वरित तीन जणांचा शोध सुरू आहे.


मुंबईत सक्रीय असलेल्या ट्रान्सजेंडर गँगने याआधी काही गुन्हे केले आहेत याचाही तपास सुरू आहे. पोलीस सर्व बाजू तपासून बघत आहेत.


Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : 'रेड कार्ड'मुळे डॉमिनोज चे ९.५ कोटींचे फ्री पिझ्झा वाटप!

फिफा वर्ल्ड कप २०२६ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या स्पर्धेतील केवळ खेळाचा थरारच नाही, तर एका

Pankaj Bhoyar : कस्तुरबा गांधी विद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक लवकरच मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडणार

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पालघर जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी निवासी

Gold Silver Rate Today : सोने घ्यायचं की थांबायचं? पुन्हा बदलले दर; चांदीनेही गाठला विक्रमी टप्पा, जाणून घ्या आजचे भाव

Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा बदल झाला असून, ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष आजच्या ताज्या

Yogesh Kadam : भाषणे ठोकून मते मिळत नाहीत, जनतेत उतरावे लागते; मंत्री योगेश कदमांचा राज ठाकरेंना थेट टोला!

- सोशल मीडियावरील विकृत प्रवृत्तींना चाप बसणार, महायुती सरकार लवकरच नवा कायदा आणण्याच्या तयारीत मुंबई : केवळ

Prakash Abitkar : राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे 'ऑडिट' होणार?

आरोग्यमंत्री सकारात्मक; टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेससारख्या संस्थांची निवड होणार मुंबई : राज्यातील

Horrific bus accident : रत्नागिरीत दोन बसेसची समोरासमोर धडक; १५ विद्यार्थी जखमी

रत्नागिरी: रत्नागिरीतील मिरजोळे-उक्षी मार्गावर गुरुवारी सकाळी दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची