खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियोजनासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. नवी मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा खारघर किनारा प्रस्तावित मार्गिकाच्या प्रकल्पाच्या निर्माणास वन विभागाच्या परवानग्या मिळाल्यानंतर २०२६ मध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी असलेल्या या प्रकल्पामुळे खारघर, नेरुळ आणि बेलापूर भागातील वाहतूक सुलभ होणार आहे. हा प्रकल्प २०२९ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


तसेच शीव-पनवेल मार्गावरही मोठ्याप्रमाणात वाहनांचा भार असतो. वाहतूक कोंडीमुळे सुटका मिळावी यासाठी खारघर किनारी प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून निर्माण केला जाणार आहे. हा मार्ग ९.६८ किमी लांबीचा आणि ३० मीटर रुंदीचा असेल. मार्ग खारघर आणि नेरुळ भागाला जोडला जाणार आहे.


खारघरमधील जलमार्ग सेक्टर १६ पासून खारघर रेल्वे स्थानकाजवळील पीएमएवाय गृहनिर्माण योजनेर्पंत तसेच नेरुळमधील भूमिगत मार्गापर्यंत हा प्रकल्प विस्तारित केला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शीव पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. २०२६ मध्ये सुरुवातीच्या काही महिन्यांत या प्रकल्पाच्या निर्माणास सुरुवात होणार असून २०२९ मध्य प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.


नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. विमानतळाच्या निर्मितीमुळे भविष्यात रस्ते मार्गावरही वाहनांचा भार वाढणार आहे. त्यामुळे या विमानतळाला जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. हा मार्ग सहा वाहिन्यांचा असेल. त्यामुळे भविष्यातील या मार्गावरील प्रवास वेगवान असेल. ९.६८ किमी लांबीचा असून त्यापैकी ६.६९ किमीची मार्गिका पूर्णपणे नव्याने बांधली जाणार आहे. तर २.९९ किमी मार्गिकाही पूर्वीच्याच मार्गिकेत दुरुस्ती करून ती या प्रकल्पाला जोडली जाणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या आर्थिक घडीला देखील चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Travel Outfits : प्रवासात कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही हवे? ट्राय करा हे ८ ट्रेंडी आउटफिट्स

लांबचा प्रवास असो किंवा विकेंड ट्रिप, स्टायलिश दिसतानाच आरामदायी कपडे घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य

Water Worship : तब्बल चार वर्षानंतर महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलपूजन

नाशिक : नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर गंगापूर धरणातील जलपूजनाचा

Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

रत्नागिरी : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ –

Ladoo : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; सत्य घटनेवर आधारित 'लाडू' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका