भारत-नेपाळ सीमेवर कारवाई; व्हिसा नसल्याने दोन विदेशी नागरिक अटकेत

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांचे तपास नेटवर्क अधिकच कठोर झाले आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागांतील तपास अजूनही सुरू आहे. उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये धाड सत्र सुरू आहे. स्फोट प्रकरणी काही डॉक्टरांना अटक झाली आहे. फरिदाबादच्या डॉ. शाहीन आणि लखनऊच्या डॉ. परवेझ यांना स्फोट प्रकरणाशी संबंध असल्याचे पुरावे हाती आले आहेत. या दोघांना अटक करण्यात आली आहे.


त्याचवेळी, भारत-नेपाळ सीमेवर एक मोठा घुसखोरीचा डाव पोलिसांनी उडवून लावला आहे. बहराइचमध्ये दोन ब्रिटिश नागरिकांना अटक करण्यात आली आहे, ज्यात एक ३५ वर्षीय पाकिस्तानी युवक आणि दुसरी ६१ वर्षीय महिला, ब्रिटिश नागरिक असून ती मूळची भारतीय आहे. यांना भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.


शनिवारी सकाळी १० वाजता नेपाळगंजहून रुपैडिहाला प्रवास करणाऱ्या दोघांना थांबवण्यात आले आणि त्यांची कागदपत्रे तपासली गेली. त्यावेळी यांच्याकडे भारतात प्रवेश करण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्रे आढळली नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली गेली. या दोघांवरही भारतीय सीमेत अनधिकृतपणे प्रवेश करण्याचा आरोप ठेवला आहे आणि त्यांना बहराइच न्यायालयात हजर करण्यात आले आहे, असे रुपैडिहा पोलिस स्टेशनचे अधिकारी रमेश सिंह रावत म्हणाले.


अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्तींची ओळख पटली असून, ६१ वर्षीय सुमित्रा शकील ओलिव्हिया, ज्या कर्नाटकमधील उडुपी येथील आहे आणि ब्रिटिश पासपोर्ट धारक आहेत, त्याचा सध्याचा पत्ता ग्लुसेस्टर, युनायटेड किंग्डम आहे. हे दोघेही पाकिस्तानी हसन अम्मान सलीम याच्याशी संपर्कात आहेत. पुढील कारवाईसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.


दिल्लीतील स्फोटाशी संबंधित तपास वेगाने पुढे जात आहे आणि त्यामध्ये युनायटेड किंग्डम आणि पाकिस्तानमधील नागरिकांचा समावेश असल्याने तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय पातळीवरही कार्यरत आहेत. आतापर्यंत काही महत्त्वपूर्ण माहिती उघडकीस आलेली आहे, परंतु याची तपासणी सुरू आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी