तीन दिवसांत 28 काळवीटांचा मृत्यू; कर्नाटक प्राणीसंग्रहालयावर संशयाचे सावट

कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर राणी चेन्नम्मा प्राणीसंग्रहालयात गेल्या तीन दिवसांत तब्बल 28 काळवीटांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्राणिसंग्रहालयात १३ नोव्हेंबरला ८ आणि १५ नोव्हेंबरला आणखी 20 काळवीटांची मृत्यू नोंद झाली आहे. अचानक वाढलेल्या मृत्युमुळे वन विभाग सतर्क झाल्याचे माहितीवरून समजते. वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.


कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांद्रे यांनी या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त करून तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अहवालात काळवीटांमध्ये संसर्गजन्य आजाराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार प्राणीसंग्रहालयातील इतर प्राण्यांना धोका होऊ नये म्हणून सर्व प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


याशिवाय दूषित पाणी-अन्न किंवा मांजरींसारख्या पाळीव प्राण्यांमुळे आजार पसरला का, हेही तपासले जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ समिती गठित करण्याचे आदेश देत वनमंत्र्यांनी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचेही स्पष्ट केले आहे.


कित्तूर राणी चेन्नम्मा किंवा भूतरामनहट्टी प्राणीसंग्रहालय1989 मध्ये स्थापन झाले असून बेळगाव शहरापासून सुमारे 12 किलोमीटरवर राष्ट्रीय महामार्ग 4 जवळ 31.68 हेक्टर जागेत वसले आहे. विभागीय वन अधिकारी एन.ई. क्रांती यांनी सांगितले की मृत्यू जिवाणू संसर्गामुळे झाले असून, बंगळुरूच्या बन्नेरघट्टा पशुवैद्यकीय विज्ञान संस्थेतील तज्ज्ञांची टीम तपासासाठी येणार आहे.

Comments
Add Comment

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार

अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला

‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ

सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज चालणार नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८

गोव्यातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव! २५ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री प्रमोद सांवतांनी दिले चौकशीचे आदेश

अर्पोरा: गोव्यातील अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. बर्च बाय रोमियो

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास