खरडलेल्या शेतजमिनींसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, मोफत !

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर मोफत पुरवण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने शुक्रवारी जारी केले.


शेतकऱ्यांना त्यांची जमीन पुन्हा लागवडीयोग्य व सुपीक करण्यासाठी लागणाऱ्या माती, गाळ, मुरूम, कंकर या गौण खनिजांवरील रॉयल्टी माफीच्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.


राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतपिकांचे नुकसान झाले. शिवाय, मनुष्य व पशुहानी यासह शेतजमीन खरडून जाणे, अतिरिक्त गाळ साठणे आणि जमिनीचा सुपीकस्तर वाहून जाण्याच्या घटना घडल्या.


जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय


नैसर्गिक आपत्तीग्रस्त व्यक्तींना घर, गुरांचा गोठा, शेत व विहीर यांसाठी आवश्यक पाच ब्रास गौण खनिजाच्या वापरासाठी स्वामित्वधनातून सूट मिळेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री, महाराष्ट्र

Comments
Add Comment

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६

Mumbai: परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली मोठी फसवणूक, आरोपी फरार

मुंबई : मुंबईत परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०