अलिबाग नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

उबाठा गटाचे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे संकेत


अलिबाग : अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा शेकाप नेते शेकाप नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती; परंतु आता आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. अलिबागमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष एकही जागा सोडण्यास तयार नसल्याने शिवसेना या आघाडीतून बाहेर पडल्यात जमा आहे.


अलिबाग शहरातील २० जागांपैकी शेकापने दान जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला दिल्या आहेत. काँग्रेसने या जागांवर अभय महामुणकर आणि समीर ठाकूर यांना उमेदवारी जाहीर करीत ते प्रचारालाही लागले आहेत. शिवसेनेने शेकापकडे तीन जागांची मागणी केली होती; परंतु अद्यापपर्यंत एकही जागा देण्याची तयारी शेकापने दाखविलेली नाही. मागील अलिबाग नगरपालिका निवडणुकीत शेकापचे सर्व १७ जागांवर उमेदवार निवडून आले होते. आता नवीन नगरपालिकेत २० जागा असणार आहेत. त्यातील तीन जागा आपल्यालाच मिळाव्यात, अशी शिवसेना ठाकरे गटाची अपेक्षा आहे; परंतु कुठली जागा द्यायची, असा पेच शेकापसमोर आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. जर शेकापने आमचा विचार केला नाही, तर स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस उरलेले असतानाही शेकापकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तीन ते चार जागा लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याची माहिती जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी ‘दैनिक प्रहार’शी बोलताना दिली.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी