अलिबाग नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

उबाठा गटाचे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे संकेत


अलिबाग : अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा शेकाप नेते शेकाप नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती; परंतु आता आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. अलिबागमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष एकही जागा सोडण्यास तयार नसल्याने शिवसेना या आघाडीतून बाहेर पडल्यात जमा आहे.


अलिबाग शहरातील २० जागांपैकी शेकापने दान जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला दिल्या आहेत. काँग्रेसने या जागांवर अभय महामुणकर आणि समीर ठाकूर यांना उमेदवारी जाहीर करीत ते प्रचारालाही लागले आहेत. शिवसेनेने शेकापकडे तीन जागांची मागणी केली होती; परंतु अद्यापपर्यंत एकही जागा देण्याची तयारी शेकापने दाखविलेली नाही. मागील अलिबाग नगरपालिका निवडणुकीत शेकापचे सर्व १७ जागांवर उमेदवार निवडून आले होते. आता नवीन नगरपालिकेत २० जागा असणार आहेत. त्यातील तीन जागा आपल्यालाच मिळाव्यात, अशी शिवसेना ठाकरे गटाची अपेक्षा आहे; परंतु कुठली जागा द्यायची, असा पेच शेकापसमोर आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. जर शेकापने आमचा विचार केला नाही, तर स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस उरलेले असतानाही शेकापकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तीन ते चार जागा लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याची माहिती जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी ‘दैनिक प्रहार’शी बोलताना दिली.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या