बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे. या घडीला, लालू यांची कन्या आणि तेजस्वी यादवची बहिण असलेलय रोहिणी आचार्यने राजकारण पूर्णपणे सोडत असल्याची आणि कुटुंबीयांपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे.


रोहिणी आचार्य यांनी ट्विटरवर (X) लिहिले, “मी राजकारणातून बाहेर पडत आहे आणि माझ्या कुटुंबीयांशी सर्व संबंधदेखील तोडत करत आहे. संजय यादव आणि रमीझ यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे.”


व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणीने काही वर्षांपूर्वी वडिलांना किडनी दान केली होती तेव्हा ती खूप चर्चेत आली होती. त्यांनी मागील वर्षी सारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण भाजपाचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.


या निवडणूक निकालानंतर RJD मध्ये अंतर्गत मतभेद स्पष्ट झाले आहेत. हा पक्षासाठी मोठा धक्का आहे. महाआघाडीच्या ६६ यादव उमेदवारांपैकी फक्त १२ जण विजयी झाले, तर एनडीएकडून २३ यादव उमेदवारांपैकी १५ जण निर्वाचित झाले. याचा अर्थ असा की यादव समाजाचा मोठा हिस्सा RJD ऐवजी NDA कडे वळला आहे.


रोहिणी आचार्यचा निर्णय हा केवळ राजकीय नसून कौटुंबिक स्तरावरही धक्कादायक ठरला आहे. वडील लालू प्रसाद यादवांसोबत तीचे नाते खूप घनिष्ट आहे; किडनी दान हे त्याचं स्पष्ट उदाहरण आहे.


रोहिणी आचार्यने स्पष्ट केले आहे की, “माझ्या राजकीय महत्वाकांक्षा किंवा कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. माझा आत्मसन्मान माझ्यासाठी सर्वोच्च आहे.”


मागील काही वर्षांत देखील तेज प्रताप यादव आणि आता रोहिणी आचार्य यांनी कुटुंबापासून अंतर ठेवले असून, यादव कुटुंबातील राजकीय आणि कौटुंबिक तणाव आता बाहेर येत आहेत.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.