शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख


केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर ‘आरोप पत्र प्रमुख’ आणि ‘मीडिया संपर्क’ची दुहेरी जबाबदारी


मुंबई : भारतीय जनता पार्टी–महाराष्ट्रने आगामी महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक २०२५ साठी महत्त्वाची प्रदेश संचालन समिती जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या या यादीत २३ पदांसाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.


समन्वयक म्हणून माधवी नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहसमन्वयक म्हणून विक्रांत पाटील यांची निवड झाली आहे. जाहिरनामा प्रमुख म्हणून विश्वास पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे.


निवडणूक कार्यक्रम, प्रचार, महिला, युवा, सामाजिक, सहकार, कृषी अशा सर्व विभागांसाठी स्वतंत्र प्रमुख नेमण्यात आले आहेत. विविध समाजघटकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.


निवडणूक साहित्य, वितरण, मीडिया आय.टी., कारभार, कार्यालयीन समन्वय यांसाठी देखील अनुभवी कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.


भाजपने घोषणा केलेली ही समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाची रणनीती मजबूत करण्यासाठी निर्णायक मानली जात आहे.

Comments
Add Comment

कागलमध्ये ३५७.९९ कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान व केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार व्यक्त

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे.३५७.९९

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,