शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख


केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर ‘आरोप पत्र प्रमुख’ आणि ‘मीडिया संपर्क’ची दुहेरी जबाबदारी


मुंबई : भारतीय जनता पार्टी–महाराष्ट्रने आगामी महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक २०२५ साठी महत्त्वाची प्रदेश संचालन समिती जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या या यादीत २३ पदांसाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.


समन्वयक म्हणून माधवी नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहसमन्वयक म्हणून विक्रांत पाटील यांची निवड झाली आहे. जाहिरनामा प्रमुख म्हणून विश्वास पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे.


निवडणूक कार्यक्रम, प्रचार, महिला, युवा, सामाजिक, सहकार, कृषी अशा सर्व विभागांसाठी स्वतंत्र प्रमुख नेमण्यात आले आहेत. विविध समाजघटकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.


निवडणूक साहित्य, वितरण, मीडिया आय.टी., कारभार, कार्यालयीन समन्वय यांसाठी देखील अनुभवी कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.


भाजपने घोषणा केलेली ही समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाची रणनीती मजबूत करण्यासाठी निर्णायक मानली जात आहे.

Comments
Add Comment

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला पुणे : पुणे शहरात