सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग हॉस्पिटलमध्ये ; प्रकृतीत सुधार

सिक्कीम : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांना गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान त्यांना नाकातून रक्तस्राव सुरू झाला आणि ब्लड प्रेशरही वाढल्याची माहिती समोर आली. तत्काळ सुरक्षा पथक आणि वैद्यकीय टीमने त्यांना रंगपो येथील कार्यक्रमस्थळावरून राजधानी गंगटोकमधील रुग्णालयात हलवले.


घटनेची माहिती त्यांच्या पुत्राने आणि सिक्कीमचे युवा आमदार आदित्य तमांग यांनी दिली. त्यांच्या मते, सीएम तमांग रंगपो ग्राउंडवरील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. याच वेळी अचानक नाकातून रक्त येऊ लागले आणि बीपी वाढल्याचे लक्षात आहे. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.


आदित्य तमांग यांनी पुढे सांगितले की, सीएम तमांग यांची अवस्था आता स्थिर आहे आणि अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे. नाकातून रक्त येण्याची समस्या त्यांना यापूर्वीही काही वेळा झाली आहे, पण या वेळी सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी संपूर्ण रात्र त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू