सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग हॉस्पिटलमध्ये ; प्रकृतीत सुधार

सिक्कीम : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांना गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान त्यांना नाकातून रक्तस्राव सुरू झाला आणि ब्लड प्रेशरही वाढल्याची माहिती समोर आली. तत्काळ सुरक्षा पथक आणि वैद्यकीय टीमने त्यांना रंगपो येथील कार्यक्रमस्थळावरून राजधानी गंगटोकमधील रुग्णालयात हलवले.


घटनेची माहिती त्यांच्या पुत्राने आणि सिक्कीमचे युवा आमदार आदित्य तमांग यांनी दिली. त्यांच्या मते, सीएम तमांग रंगपो ग्राउंडवरील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. याच वेळी अचानक नाकातून रक्त येऊ लागले आणि बीपी वाढल्याचे लक्षात आहे. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.


आदित्य तमांग यांनी पुढे सांगितले की, सीएम तमांग यांची अवस्था आता स्थिर आहे आणि अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे. नाकातून रक्त येण्याची समस्या त्यांना यापूर्वीही काही वेळा झाली आहे, पण या वेळी सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी संपूर्ण रात्र त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक