बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल स्पष्ट होताच भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि देशाला संबोधित केले.


एनडीएच्या भक्कम कामगिरीनंतर आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी बिहारमधील नागरिकांचे मनापासून आभार मानले. मतदारयादीच्या दुरुस्तीसाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मोहिमेला सर्वपक्षीय सहकार्य मिळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी विरोधकांवरही टोला लगावत मतदारांच्या जागरूकतेचे कौतुक केले.


मोदी म्हणाले की, “या वेळी दोन टप्प्यात मतदान झाले, पण कुठेही पुनर्मतदानाची वेळ आली नाही. हे शांततापूर्ण मतदानासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे, सुरक्षा दलांचे आणि जागरूक मतदारांचे यश आहे. देशाला तुमचा अभिमान वाटतो.”


पंतप्रधानांनी सांगितले की बिहारने मतदारयादी सुधारण्याच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देऊन लोकशाहीची पवित्रता जपली आहे. “आता प्रत्येक राजकीय पक्षाने बूथवर संघटनांना सक्रिय करून हे काम पुढे न्यायला हवे. जेणेकरून देशभरात मतदारयादी अधिक पारदर्शक बनेल,” असे ते म्हणाले.


मोदी म्हणाले, “लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारने आज पुन्हा एकदा खोट्या राजकारणाला धडा शिकवला. जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे की जामिनावर बाहेर असलेल्या नेत्यांना ते साथ देणार नाहीत.”


ते पुढे म्हणाले, “आज भारत खऱ्या सामाजिक न्यायासाठी मतदान करत आहे, जिथे प्रत्येक कुटुंबाला समान संधी, सन्मान आणि विकासाचा मार्ग खुला आहे. फक्त तात्पुरते खुश करणे नाही, तर लोकांच्या मनात खरी समाधानाची भावना निर्माण करणे हेच जनतेला अपेक्षित आहे."


बिहारमधील कथाकथित ‘जंगलराज’चा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “हा विजय त्या माताभगिनींचा आहे ज्यांनी त्या काळात भीतीचे दिवस पाहिले आहेत, आणि त्या तरुणांचा आहे ज्यांचे भविष्य हिंसाचाराने प्रभावित झाले होते. आता बिहार विकासाच्या दिशेने धावत आहे आणि ही प्रगती थांबणार नाही.”

Comments
Add Comment

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि