नितीश कुमार होणार मुख्यमंत्री! मतमोजणीची आकडेवारी येताच नेत्यांचा जल्लोष

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतांची मोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एनडीएला आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये एनडीएच्या जागांवर उभ्या असलेल्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली आहे.


दरम्यान बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील. नितीश कुमार यांना कमी लेखणाऱ्यांना आता त्यांची खरी किंमत कळली आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे. एनडीए जिंकल्यास नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का? हा प्रश्न सर्वांना पडला होता. अशोक चौधरी यांच्या या विधानामुळे आता सर्वांना उत्तर मिळाले आहे.




बिहारमध्ये मतदान मोजणीला सुरुवात झाल्यावर नितीश कुमार यांचे पोस्टर्स लागले. या पोस्टर्समध्ये त्यांचे वर्णन वाघ म्हणून केले आहे. ज्यावर लिहिले होते, "वाघ अजूनही जिवंत आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांचे आभार..." त्यात आता आकडेवारी पुढे यायला सुरुवात झाल्यावर एनडीए समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तर जेडीयूचे कार्यकर्ते नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे