नितीश कुमार होणार मुख्यमंत्री! मतमोजणीची आकडेवारी येताच नेत्यांचा जल्लोष

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतांची मोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एनडीएला आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये एनडीएच्या जागांवर उभ्या असलेल्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली आहे.


दरम्यान बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील. नितीश कुमार यांना कमी लेखणाऱ्यांना आता त्यांची खरी किंमत कळली आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे. एनडीए जिंकल्यास नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का? हा प्रश्न सर्वांना पडला होता. अशोक चौधरी यांच्या या विधानामुळे आता सर्वांना उत्तर मिळाले आहे.




बिहारमध्ये मतदान मोजणीला सुरुवात झाल्यावर नितीश कुमार यांचे पोस्टर्स लागले. या पोस्टर्समध्ये त्यांचे वर्णन वाघ म्हणून केले आहे. ज्यावर लिहिले होते, "वाघ अजूनही जिवंत आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांचे आभार..." त्यात आता आकडेवारी पुढे यायला सुरुवात झाल्यावर एनडीए समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तर जेडीयूचे कार्यकर्ते नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान