बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय, भाजप सर्वात मोठा पक्ष


पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला. भारतीय जनता पार्टी (BJP) बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष झाली. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार भारतीय जनता पार्टी ८२ जागांवर जिंकली आणि ७ जागांवर आघाडीवर आहे. जनता दल युनायटेड (JDU) ७५ जागांवर जिंकली आणि १० जागांवर आघाडीवर आहे. लोकजनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) १७ जागांवर जिंकली आणि २ जागांवर आघाडीवर आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चा सेक्युलर (HAMS) ५ जागांवर जिंकली आहे तर राष्ट्रीय लोक मोर्चा ४ जागांवर जिंकली आहे. बिहार विधानसभेच्या २४३ पैकी २०२ जागांवर एनडीए विजयी किंवा आघाडीवर आहे. भाजपच्या नेतृत्वात एनडीएने विरोधकांचा धुव्वा उडवला.


बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे मॉडेल आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुशासनाचे मॉडेल लोकप्रिय झाले. जनतेची या दोन्हीला पसंती लाभली. पंतप्रधान मोदींनी जंगलराजच्या मुद्यावरुन थेट लालूप्रसाद यादव आणि राष्ट्रीय जनता दलाला लक्ष्य केले तर राज्य सरकारने निवडणुकीच्या काही दिवस आधीच कल्याणकारी योजनांचा पाऊस पाडला. याचा एनडीएला निवडणुकीत फायदा झाला.


मराठा चेहरा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी, पक्षनिष्ठा यामुळे महाराष्ट्रातले नेते असलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडेंनी संघटनात्मक पातळीवर पक्षाचे काम प्रभावीरित्या केले. एनडीएच्या ऐतिहासिक विजयात विनोद तावडे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यांना भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांचीही उत्तम साथ लाभली. या जोडगोळीने बिहारमध्ये भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवले. लोकगायिका मैथिली ठाकूर यांना भाजपमध्ये आणण्यात विनोद तावडेंनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व प्रयत्नांला यश लाभले. बिहारमध्ये भाजपने अभूतपूर्व असे यश मिळवले.


Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात