अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची दमदार आघाडी

बिहार : बिहारच्या अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर यांनी पहिल्याच प्रयत्नात भक्कम आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या निकालांमधून दिसत आहे की स्थानिक मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या अंदाजे एक महिना आधीच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत “बिहारची सेवा” करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.


बिहार निवडणूक 2025 चे निकाल उत्सुकतेने पाहत असताना, एक्झिट पोलमध्ये एनडीएच्या मोठ्या विजयाचे संकेत मिळाल्यानंतर मैथिली ठाकूर यांनी “पूर्णपणे तयार” असल्याची भावना व्यक्त केली. आपल्या निवडणूक प्रचारातील तीस दिवसांच्या अनुभवाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की विजय-पराजयावर विचार करण्यापेक्षा लोकांशी झालेल्या नव्या संबंधाने त्यांना समाधान मिळाले आहे.


त्यांच्या मते, निवडणूक लढवण्याचा निर्णय हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. लोकांसोबत संवादातून ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्या कोणत्याही पुस्तकातून किंवा इतर माध्यमातून शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. हा एक महिना त्यांच्या आयुष्याला नव्या दिशेने घेऊन गेला, असेही त्या म्हणाल्या.


यापूर्वीच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की त्यांना आपल्या लोकगीतांमधून बिहारचे संस्कृतिक मूल्य जगासमोर आणण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांनी परदेशात जाण्याचा मार्ग निवडला नाही. राजकारण हा करिअरपेक्षा प्रदेशाची सेवा करण्याचा माध्यम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


काही वर्षांपूर्वीपर्यंत राजकारणाबद्दल विशेष ओढ नसलेल्या मैथिली ठाकूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांनी आणि नेतृत्वाने प्रेरित केले. मोदी हे तरुणांसाठी मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणे म्हणजे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला