Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या नावाखाली क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे गोळा करण्याचा आणि ते विदेशात वळवण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेले १० लाख रुपये विदेशात वळवण्यात आले आहेत. या प्रकरणी एटीएस (ATS) ने तातडीने कारवाई करत सय्यद बाबर अली सय्यद महमूद अली नावाच्या आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणा सर्व पातळीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर, एटीएसकडून छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मध्ये शोधमोहीम (Search Operation) सुरू करण्यात आली आहे. गाझा मदतीच्या नावाखाली झालेल्या या गैरप्रकारामुळे आणि दिल्ली स्फोटामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.



पॅलेस्टाईन मदतीच्या नावाखाली बनावट QR कोडचा वापर


गाझा-पॅलेस्टाईन युद्धातील नागरिकांना मदतीच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करून निधी गोळा करण्याच्या प्रकरणात एटीएसच्या (ATS) तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने नागरिकांना भावनिक आवाहन करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपीने फसवणूक करण्यासाठी दोन संस्थांचा वापर केला ज्यात आरोपीने 'अहमद राजा फाउंडेशन' या नोंदणी नसलेल्या (Unregistered) संस्थेच्या नावाने एक बनावट QR कोड तयार केला. या QR कोडद्वारे नागरिकांना भावनिक साद घालून पैशांची मागणी करण्यात आली. याचबरोबर, त्याने 'राजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन' या नोंदणीकृत (Registered) संस्थेचा आधार घेऊनही निधी जमा केला. या दोन्ही मार्गांनी जमा केलेले एकूण १० लाख २४ हजार रुपये आरोपीने थेट स्वतःच्या खात्यात वळवून घेतले आहेत. एटीएसच्या या तपासामुळे मदतीच्या नावाखाली सुरू असलेल्या या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला असून, नागरिकांनी ऑनलाईन देणगी देताना अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.



'टेरर फंडिंग'च्या दिशेने एटीएसचा तपास


एटीएसच्या तपासानुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी बाबर अली याने स्वतःच्या खात्यातील एकूण १० लाख २४ हजार २२० रुपये इतकी मोठी रक्कम एका आंतरराष्ट्रीय पोर्टलद्वारे विदेशात पाठवली आहे. आरोपीने ही रक्कम GOFUNDM.COM या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून परदेशात ट्रान्सफर केली. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गोळा केलेले पैसे थेट विदेशात पाठवल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, ज्याचा तपास एटीएस करत आहे, ही मोठी रक्कम नेमकी कोणत्या उद्देशाने विदेशात पाठवण्यात आली? विदेशात पाठवलेल्या या पैशांचा कशा प्रकारे वापर करण्यात आला? या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी (Terror Funding) तर केला जात नाही ना? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एटीएसचा तपास आता अधिक तीव्र झाला असून, या तपासातून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहाणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.