Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयतानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधीवर हल्लाबोल

पाटणा : बिहार विधानसभेच्या निकालांत एनडीएला मोठं यश मिळाल्यानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. बिहारच्या जनतेनं स्पष्ट बहुमत देत एनडीए सरकारला मार्ग मोकळा करून दिला आहे. या विजयावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठा निशाणा साधला आहे.


फडणवीस म्हणाले की, “बिहारच्या नागरिकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. लोकांनी विकासाला मत दिलं आहे. या वेळची स्थिती २०१० मधील विक्रमालाही मागे टाकेल.” चिराग पासवान, मांझी, उपेंद्र कुशवाहा आदी मित्रपक्षांनाही जनतेनं मोठा प्रतिसाद दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


काँग्रेस आणि राहुल गांधीने देशभरात चालवलेल्या प्रचारावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “सतत घटनात्मक संस्थांवर टीका करणे, सरकारच्या कार्यपद्धतीवर बिनबुडाचे आरोप करणे, या सर्व गोष्टींमुळेच काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. राहुल गांधी ज्या पद्धतीने आरोपांच्या राजकारणात मग्न आहेत, त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये दिसत आहे. बिहारमध्ये तर काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात कमी आकडा नोंदवला गेलाय.”


राहुल गांधींनी मांडलेल्या ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर त्यांनी व्यंगात्मक भाष्य करत, लोकांचा पूर्ण विश्वास मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर असल्याचं सांगितलं. तसेच काँग्रेस आणि इतर महाआघाडीने आता गंभीर आत्मपरीक्षण करायला हवं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.


फडणवीस यांनी सांगितलं की, “बिहारच्या निवडणुकांत जातीय समीकरणं किंवा इतर मुद्द्यांपेक्षा विकास आणि सुशासन यांनाच लोकांनी प्राधान्य दिलं. मागील काळात जिथे थोडी नाराजी दिसत होती, यावेळी मात्र प्रो-इन्कम्बन्सीची लाट होती. आम्हाला १६० जागा मिळणार अशी अपेक्षा होती, परंतु त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला.”


या निकालांनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न उपस्थित होत असताना फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “हा निर्णय आमचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व तसेच नितीश कुमार हे एकत्रितपणे घेतील. मुख्यमंत्री कोण होणार यावर वक्तव्य करण्याचा अधिकार मला नाही.” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment

Kalyan Crime : कल्याणामध्ये विकृतीचा कळस; ७ वर्षांच्या मुलीला टोमॅटो देण्याच्या बहाण्याने घरात ओढून अत्याचार

Kalyan: कल्याणमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या  ७ वर्षांच्या चिमुरडीवर एका नराधमाने लैंगिक

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश; धान्य वितरणाची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली

लाखो शिधापत्रिकाधारकांना दिलासा; उद्यापासून स्वस्त धान्य दुकानांमधून पुन्हा वितरण सुरू मुंबई, दि. २४ जून :

Chief Minister Devendra Fadnavis : कॉर्पोरेट जिहाद' रोखण्यासाठी कायद्यात बदल होणार

कॉर्पोरेट जिहादला लगाम, कायद्यात बदल होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; विधानसभा आणि विधान

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात ॲमेझॉनसाठी गुंतवणुकीच्या व्यापक संधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांची मुख्यमंत्र्यांशी सदिच्छा भेट मुंबई, दि. २४ : डेटा सेंटर

Mumbai News : मुंबईतील जुन्या भागांचे रूप पालटणार

म्हाडाचे ९२५ एकरांवर ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ४ लाख कोटींची होणार गुंतवणूक मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील