बिहारमध्ये कोण मारणार बाजी ? एनडीए जिंकणार की महागठबंधनची सत्ता येणार ?


पाटणा : बिहारच्या विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. मतमोजणी शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीए आणि महागठबंधन यांच्यापैकी कोण बाजी मारणार याविषयी जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक आहे. विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान झाले. बिहारमध्ये ७४.२ दशलक्ष नोंदणीकृत मतदार आहेत. यात ३९.२ दशलक्ष पुरुष आणि ३५ दशलक्ष महिला आहेत. विधानसभेसाठी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ६५.०८ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ६८.७६ टक्के मतदान झाले.


विविध एक्झिट पोल्सनी राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) 'क्लीन स्वीप' करणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सर्व प्रमुख एक्झिट पोल्सनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, असे भाकीत केले आहे. पीपल्स इनसाइट (People's Insight), पीपल्स पल्स (People's Pulse), मॅट्रिझ (Matrize), दैनिक भास्कर (Dainik Bhaskar), पीएमआरक्यू (PMRQ) आणि जेव्हीसी पोल्स (JVC's Polls) या सहा एक्झिट पोल्सनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज दिला आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील 'महागठबंधन'ला मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोल्सनुसार, 'महागठबंधन' ७० ते १०२ जागांच्या दरम्यान अडकण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाने एकट्याने ७५ जागा जिंकल्या होत्या आणि त्यांचे आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. त्या तुलनेत यंदा 'महागठबंधन'ची पीछेहाट होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांची जनसुराज पार्टी यंदाच्या निवडणुकीत विशेष प्रभाव पाडणार नाही असे चित्र आहे.



विविध एक्झिट पोल्सनुसार एनडीएला मिळणाऱ्या जागांचा अंदाज :




  • पीपल्स इनसाइट (People's Insight): १३३-१४८ जागा




  • पीपल्स पल्स (People's Pulse): १३३-१५९ जागा




  • मॅट्रिझ (Matrize): १४७-१६७ जागा




  • दैनिक भास्कर (Dainik Bhaskar): १४५-१६० जागा




  • जेव्हीसी पोल्स (JVC's Polls): १३५-१५० जागा




 

एक्झिट पोलचा तपशील (Seats)











































एक्झिट पोल



NDA



महागठबंधन 



जनसुराज 



इतर 



पीपल्स इनसाइट



१३३-१४८



८७-१०२



०-२



३-६



मॅट्रिझ



१४७-१६७



७०-८०



०-२



२-८



दैनिक भास्कर



१४५-१६०



७३-९१



०-०



५-१०



पीपल्स पल्स



१३३-१५९



७५-१०१



०-५



२-८



Comments
Add Comment

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

Tribal Development : आदिवासींच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दार उघडले

- राज्य शासनाचा पुढाकार; 'शबरी नॅचरल्स' ब्रँडचे नाशिकच्या दिंडोरीत प्रक्रिया युनिट मुंबई : राज्यातील आदिवासी

Cesar Gastelum : मेक्सिकोत प्रसिद्ध टिकटॉक इन्फ्लुएन्सर सीझर गॅस्टेलम यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या; जगभरात खळबळ

मेक्सिको : सोशल मीडियाच्या आभासी जगात आपल्या अनोख्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा एक

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती