MIM मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार, एवढे उमेदवार रिंगणात उतरवणार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. हे आरक्षण जाहीर होऊन दोन दिवस होत नाहीत तोच ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने अर्थात एमआयएमने मुंबईच्या राजकारणात मोठा बॉम्ब फोडला आहे. एमआयएमने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, ही माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष हाजी फारुख मक्बुल शाब्दी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हाजी शाब्दी म्हणाले, 'मुंबई महापालिकेसाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही किमान ५० उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहोत. लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाईल.' पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “आमचा पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर काम करत आहे. पक्षात दीर्घकाळ कार्य करणाऱ्यांनाच तिकीट देण्यास प्राधान्य राहील. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात दाखल होणाऱ्यांचा विचार नंतर केला जाईल.”



मुंबईच्या राजकारणात समीकरणे बदलणार?


एमआयएमचा मुंबईची निवडणूक लढवण्याचा निर्णय हा काहींसाठी धक्कादायक ठरला आहे. मुंबईतील मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. यावर शाब्दी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “आमच्यावर भाजपाची ‘बी टीम’ असल्याचा आरोप काही नवा नाही. पण आम्ही आमच्या ताकदीवर, आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर निवडणूक लढवणार आहोत. कोणाच्याही फायद्यासाठी नव्हे, तर आमच्या जनतेच्या प्रतिनिधित्वासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत.”


सध्या राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा केली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२५ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडणे बंधनकारक आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीच्याही तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.


एमआयएमच्या या घोषणेमुळे मुंबईच्या राजकारणातील समीकरणे नव्याने बदलण्याची चिन्हे दिसत असून, या निवडणुकीत आता कोण कशी रणनीती आखतो, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी कांदा प्रश्न बाबत विधानभवनात

केज नगरपंचायत निधी गैरव्यवहार प्रकरण : राज्य सरकारची मोठी कारवाई; दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

मुंबई : बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायतीमध्ये 'प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)' अंतर्गत निधीच्या वितरणात झालेल्या

हरित क्रांतीकडे महाराष्ट्राची वाटचाल : २०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : (२५ मार्च) राज्याच्या पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत “महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन

मिठीच्या सफाईसाठी अखेर कंत्राटदार पावले

तीन कामासाठी प्रत्येकी दोन कंपन्यांनी दाखवले स्वारस्य मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला

महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांचा झाला टाय टाय फिश; पाणी पट्टी वाढवल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न, आयुक्तांनी काढली हवा

मुंबई: मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात बसलेल्या उबाठाच्या नगरसेवकांचा आपण सक्षम विरोधी पक्ष असल्याचे सिद्द

समुद्रात मासे कमी आणि कचराच जास्त; महापालिका सभागृहात कोळी समाजाच्या नगरसेवकांना मांडावी लागली व्यथा

मुंबई: मुंबईत सध्या मोठ्याप्रमाणात समुद्रातील कचरा आणि मलमिश्रित पाणी जात असल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र चिंता