MIM मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार, एवढे उमेदवार रिंगणात उतरवणार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. हे आरक्षण जाहीर होऊन दोन दिवस होत नाहीत तोच ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने अर्थात एमआयएमने मुंबईच्या राजकारणात मोठा बॉम्ब फोडला आहे. एमआयएमने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, ही माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष हाजी फारुख मक्बुल शाब्दी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हाजी शाब्दी म्हणाले, 'मुंबई महापालिकेसाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही किमान ५० उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहोत. लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाईल.' पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “आमचा पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर काम करत आहे. पक्षात दीर्घकाळ कार्य करणाऱ्यांनाच तिकीट देण्यास प्राधान्य राहील. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात दाखल होणाऱ्यांचा विचार नंतर केला जाईल.”



मुंबईच्या राजकारणात समीकरणे बदलणार?


एमआयएमचा मुंबईची निवडणूक लढवण्याचा निर्णय हा काहींसाठी धक्कादायक ठरला आहे. मुंबईतील मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. यावर शाब्दी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “आमच्यावर भाजपाची ‘बी टीम’ असल्याचा आरोप काही नवा नाही. पण आम्ही आमच्या ताकदीवर, आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर निवडणूक लढवणार आहोत. कोणाच्याही फायद्यासाठी नव्हे, तर आमच्या जनतेच्या प्रतिनिधित्वासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत.”


सध्या राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा केली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२५ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडणे बंधनकारक आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीच्याही तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.


एमआयएमच्या या घोषणेमुळे मुंबईच्या राजकारणातील समीकरणे नव्याने बदलण्याची चिन्हे दिसत असून, या निवडणुकीत आता कोण कशी रणनीती आखतो, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना