भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग (टीबी) रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत, देशाच्या आरोग्य क्षेत्राने साधलेल्या प्रगतीचे कौतुक केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ताज्या ग्लोबल टीबी रिपोर्ट २०२५ नुसार, भारतात २०१५ पासून नवीन टीबी प्रकरणांमध्ये तब्बल २१ टक्क्यांनी घट झाली आहे. ही घसरण जागतिक सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे.


२०१५ मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे २३७ रुग्ण नोंदवले जात होते, तर २०२४ पर्यंत हा आकडा १८७ पर्यंत खाली आला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जागतिक स्तरावर ही घट केवळ १२ टक्के आहे, तर भारताने त्यापेक्षा अधिक वेगाने सुधारणा साधली आहे.


पंतप्रधान मोदींनी ट्विट करत लिहिले, “क्षयरोगाविरुद्ध भारताचा लढा आता लक्षणीय गतीने पुढे सरकत आहे. २०१५ नंतर टीबी रुग्णसंख्येत झालेली घट ही जगातील सर्वाधिक वेगाने झालेली प्रगती आहे.”


ते पुढे म्हणाले, “उपचार सेवांचा विस्तार, निदान प्रणालीतील सुधारणा आणि उपचार यशाचा वाढता दर, या सर्व घटकांमुळे देशाने हा टप्पा गाठला आहे. या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. निरोगी भारत हेच आपले ध्येय आहे.”





WHO च्या ग्लोबल टीबी रिपोर्ट २०२५ मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, भारतात टीबीविरोधी मोहिमेमुळे लक्षणीय यश मिळाले असून, ही सुधारणा इतर देशांसाठी प्रेरणादायी आहे. भारताच्या ‘निक्षय’ उपक्रमासारख्या योजनांनी रुग्ण ओळख, उपचार आणि पोषण सहाय्य यात मोठा फरक पडल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.


आरोग्य मंत्रालयाच्या मते, केंद्र सरकारने २०२५ पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे लक्ष्य ठरवले आहे. विविध राज्यांमध्ये आरोग्य केंद्रांची संख्या वाढविणे, डिजिटल रेकॉर्ड प्रणाली, आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांबरोबर भागीदारी, या उपाययोजनांमुळे देशात टीबी नियंत्रणात आणण्यास मदत होत आहे.

Comments
Add Comment

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन

Nitish Kumar : नितीश कुमार १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेत प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या शपथविधीची तारीखही

Google Gemma 4 : एआय क्षेत्रात गुगलचा मोठा धमाका; GPT-5 आणि Llama 4 ला तगडी स्पर्धा

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने आपले अत्याधुनिक आणि ‘ओपन-सोर्स’ कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल Gemma 4

Pakistan Threatens To Target Kolkata : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली भारताला धमकी; कोलकाता शहर पाकिस्तानच्या टार्गेटवर?

- शाहीन ३ मिसाइलच्या जोरावर पाकिस्तानचा भारताला धमकी देण्याचा नाहक प्रयत्न मुंबई :

Odisha Earthquake: ओडिशात भूकंपाचे धक्के, लोक घरातून बाहेर धावले; दृश्य सीसीटीव्हीत कैद

ओडिशा: ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा भूकंप झाला, ज्यामुळे सर्वत्र घबराट पसरली. रात्री सुमारे