इंदुरीकर महाराज सोशल मीडियावरील टीकेने व्यथित, कीर्तन बंद करण्याचा दिला इशारा!

मुंबई : वारकरी संप्रदायातील समाजप्रबोधनकार आणि कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु या व्हायरल झालेल्या दृश्यांवरून अनेकांनी महाराजांवर टीकेची झोड उठवली. “साधेपणाने लग्न करावे” असा उपदेश देणारे महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा एवढ्या थाटामाटात साजरा करत आहेत, अशी सोशल मीडियावर टीका करण्यात आली.


या सततच्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी अलीकडच्या एका कीर्तनात या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खंत व्यक्त केली आणि कीर्तन सोडण्याचा संकेत दिला !


इंदुरीकर म्हणाले “आम्ही किती कष्ट करून संसार उभा केला, याचा कोणी विचार करत नाही. मुलं लहान असताना आठ-आठ दिवस त्यांच्याशी भेट होत नसे. पण आता लोक इतके खाली गेलेत की, माझ्या मुलीच्या कपड्यांवरूनही कमेंट्स करतायत, यापेक्षा वाईट काय असू शकतं. चार दिवसांपासून तिच्या कपड्यांवर बातम्या चालतायत. माझ्या घरच्यांचा यात काय दोष? तुमच्याही मुली असतील, त्यांच्या कपड्यांवर कोणी टीका केली तर काय वाटेल? या सर्वांमुळे मनःस्ताप झाला आहे.”


ते पुढे म्हणाले “मी आता कंटाळलो आहे. गेली ३१ वर्ष लोकांच्या सेवेत कीर्तनं केली, शिव्या ऐकल्या, पण हे आता घरापर्यंत पोहोचलंय. मी दोन-तीन दिवसांत एक निर्णय घेणार आहे. आणि आता थांबणार आहे"


इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा संगमनेर येथे मोठ्या दिमाखात पार पडला. कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा हा सोहळा राजेशाही थाटात झाला. रथातून मिरवणूक, टाळकरी, बायकांच्या फेऱ्या अशा पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम रंगला.


या साखरपुड्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, महाराजांनी सत्कार, हार, तुरे आणि शाल-श्रीफळ स्वीकारले नाहीत, साधेपणात त्यांनी हा सोहळा पार पाडला.


परंतु सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबावर झालेल्या टीकेमुळे त्यांनी कीर्तन सोडण्याचा इशारा दिला आहे. आता येत्या २-३ दिवसात ते कोणता निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे