इंदुरीकर महाराज सोशल मीडियावरील टीकेने व्यथित, कीर्तन बंद करण्याचा दिला इशारा!

मुंबई : वारकरी संप्रदायातील समाजप्रबोधनकार आणि कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु या व्हायरल झालेल्या दृश्यांवरून अनेकांनी महाराजांवर टीकेची झोड उठवली. “साधेपणाने लग्न करावे” असा उपदेश देणारे महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा एवढ्या थाटामाटात साजरा करत आहेत, अशी सोशल मीडियावर टीका करण्यात आली.


या सततच्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी अलीकडच्या एका कीर्तनात या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खंत व्यक्त केली आणि कीर्तन सोडण्याचा संकेत दिला !


इंदुरीकर म्हणाले “आम्ही किती कष्ट करून संसार उभा केला, याचा कोणी विचार करत नाही. मुलं लहान असताना आठ-आठ दिवस त्यांच्याशी भेट होत नसे. पण आता लोक इतके खाली गेलेत की, माझ्या मुलीच्या कपड्यांवरूनही कमेंट्स करतायत, यापेक्षा वाईट काय असू शकतं. चार दिवसांपासून तिच्या कपड्यांवर बातम्या चालतायत. माझ्या घरच्यांचा यात काय दोष? तुमच्याही मुली असतील, त्यांच्या कपड्यांवर कोणी टीका केली तर काय वाटेल? या सर्वांमुळे मनःस्ताप झाला आहे.”


ते पुढे म्हणाले “मी आता कंटाळलो आहे. गेली ३१ वर्ष लोकांच्या सेवेत कीर्तनं केली, शिव्या ऐकल्या, पण हे आता घरापर्यंत पोहोचलंय. मी दोन-तीन दिवसांत एक निर्णय घेणार आहे. आणि आता थांबणार आहे"


इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा संगमनेर येथे मोठ्या दिमाखात पार पडला. कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा हा सोहळा राजेशाही थाटात झाला. रथातून मिरवणूक, टाळकरी, बायकांच्या फेऱ्या अशा पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम रंगला.


या साखरपुड्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, महाराजांनी सत्कार, हार, तुरे आणि शाल-श्रीफळ स्वीकारले नाहीत, साधेपणात त्यांनी हा सोहळा पार पाडला.


परंतु सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबावर झालेल्या टीकेमुळे त्यांनी कीर्तन सोडण्याचा इशारा दिला आहे. आता येत्या २-३ दिवसात ते कोणता निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील