महायुतीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाणार

ना. उदय सामंत यांची घोषणा


महायुतीचा अखेर सस्पेन्स संपला


नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची उत्कंठा शिगेला


चिपळूण : महायुतीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणून लढविल्या जातील, अशी घोषणा राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी चिपळुणात आयोजित पत्रकार परिषदेत केली. या घोषणेने महायुतीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मात्र, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे दोन दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अजूनही शिकून मध्ये एकाने अर्ज दाखल केलेला नाही तर दुसरीकडे महायुती की महाविकास आघाडीतर्फे निवडणुका लढल्या जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश दादा कदम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी चिपळूणमधील हॉटेल अतिथीच्या सभागृहात एकवटले होते. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर ना. उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महायुतीतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील, अशी घोषणा करताना मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यासह आमच्या उपस्थितीत चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत महायुतीतर्फे निवडणुका लढविण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. तर आता चिपळूणमध्ये महायुतीची बैठक होण्यापूर्वी आमदार शेखर निकम यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी व पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती ना. उदय सामंत यांनी यावेळी दिली.


ते पुढे म्हणाले की, आम्ही महायुतीचा संकल्प केलेला आहे. याचे रूपांतर ३ तारखेला विजयात होणार आहे, असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्यासह धाराशिव, परभणी येथे देखील महायुतीतर्फे निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना उदय सामंत यांनी महायुतीतर्फे निवडणुका लढवल्या जातील अशी घोषणा केल्याने अखेर महायुतीचा सस्पेन्स संपला आहे. मात्र, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल असे शेवटी सांगितले.


यावेळी राज्याचे गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, चिपळूण तालुका प्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



महाविकास आघाडीचा निर्णय गुलदस्त्यात


महायुतीचा सस्पेन्स संपला असला तरी महाविकास आघाडीचा अजून निर्णय गुलदस्त्यात असल्याने महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार बुचकळ्यात सापडले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी चाचपणी करत असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

पीएम मोदी 'ॲक्शन मोड'मध्ये! भूतानमधून येताच केली बॉम्बस्फोटातील जखमींची विचारपूस, सायंकाळी तातडीची CCS बैठक

सुरक्षेवरील कॅबिनेट समितीच्या बैठकीकडे देशाचे लक्ष नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (१२ नोव्हेंबर,

Delhi Blast : दिल्ली नव्हे, तर राम मंदिर टार्गेट होतं, लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीत हादरवणारा खुलासा; दहशतवाद्यांनी राम मंदिरावर...

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला असून, अनेक

Net Direct Tax Collection: करसंकलन ७% जबरदस्त वाढत १५.३५ लाख कोटीवर तर रिफंडमध्ये घट झाली 'या' कारणामुळे

प्रतिनिधी: जीएसटी कपातीसह भरघोस खरेदी, अनुकूल वातावरण व सणासुदीच्या काळात आर्थिक वर्ष २६ मध्ये भारताचे निव्वळ

चीनची मोठी झेप! ऑनर आणणार जगातील पहिला AI Robot Phone, जाणून घ्या खास फीचर्स

बीजिंग – तंत्रज्ञानाच्या विश्वात मोठा बदल घडवणारी बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स

Central Railway : लोकलची 'लेटलतिफी' आता बंद! मध्य रेल्वेवर लवकरच लोकल 'सुसाट' धावणार, जबरदस्त प्लॅन नेमका काय?

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून (Central Railway Line) प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची

मुंबईतील नऊ विधानसभा क्षेत्रांमध्ये महिला राज!

पुरुषांना प्रभाग शोधण्याची आली वेळ मुंबई (सचिन धानजी)  मुंबईतील २२७ प्रभागांकरता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर