सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात ६ हत्तीचं वावर ; ओंकार हत्तीला सोपवणार वनतारा कडे

सिंधुदुर्ग : सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा वाढता वावर पाहायला मिळत आहे. सध्या या भागात तब्बल सहा हत्तींचा वावर असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली आहे. या हत्तींपैकी ‘ओंकार’ हत्ती बांधा आणि वाफोली परिसरात सक्रिय आहे, तर ‘बाहुबली’ हत्ती आंबोली परिसरात दिसून येत आहे. याशिवाय चार हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यातील तिलारी भागात स्थिरावल्याचे सांगितले जात आहे.


अलीकडेच ‘ओंकार’ हत्तीने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर वन विभागाने त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक पर्यावरणप्रेमी आणि प्राणीमित्र संघटनांनी ‘ओंकार’ला पकडून ‘वनतारा’ संस्थेकडे सोपवण्याच्या निर्णयाचा विरोध केला असून, त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी केली आहे.


बांधा गावातील ग्रामस्थ गुणेश गवास यांनी या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांना साईप्रसाद कल्याणकर आणि शाम धुरी यांनीही पाठिंबा दिला. वन विभागाने मात्र हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे सांगत कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही.


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटकर नगर येथे ‘ओंकार’ला ठेवण्यासाठी विशेष कॅम्प उभारण्याची घोषणा वन विभागाने केली असली तरी प्रत्यक्षात त्या दिशेने अद्याप हालचाल झालेली नाही. त्यामुळे ‘ओंकार’ला तात्पुरते वनतारा संस्थेकडे हलवून, नंतर कोल्हापूर कॅम्प तयार झाल्यावर परत आणले जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून, १४ नोव्हेंबरपर्यंत वन विभागाला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


दरम्यान, आंबोली, वाफोली आणि तिलारी परिसरात हत्तींच्या हालचाली वाढल्या आहेत. सध्या भात कापणी आणि मळणीचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बागायती शेती आणि वायंगणी शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने संरक्षणात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे.


या संपूर्ण प्रकरणामुळे वन विभाग, न्यायालय आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये ताण निर्माण झाला असून, ‘ओंकार’ हत्तीचे भवितव्य पुढील काही दिवसांत न्यायालयीन निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

Comments
Add Comment

Good Hair : केस गळतायत? मग आहारात नक्की समाविष्ट करा 'हे' ८ पदार्थ; केस होतील मजबूत आणि दाट

मुंबई : बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण आणि अयोग्य आहार यामुळे केस गळणे, केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे या

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

Crime News : सिंगापूरमध्ये बनावट हिऱ्याच्या मदतीने 2 लाख डॉलरच्या हिऱ्याची चोरी; दोन भारतीयांना अटक

नवी दिल्ली : सिंगापूरच्या चायनाटाउनमधील एका दागिन्यांच्या दुकानातून सुमारे 2 लाख सिंगापूर डॉलर (1.54 लाख अमेरिकी

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Uniform Civil Code : मध्यप्रदेश विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर

भोपाळ : मध्यप्रदेश विधानसभेत मोठ्या गदारोळात समान नागरी संहिता (ucc) विधेयक मंजूर करण्यात आले. उत्तराखंड, गुजरात

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक