सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात ६ हत्तीचं वावर ; ओंकार हत्तीला सोपवणार वनतारा कडे

सिंधुदुर्ग : सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा वाढता वावर पाहायला मिळत आहे. सध्या या भागात तब्बल सहा हत्तींचा वावर असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली आहे. या हत्तींपैकी ‘ओंकार’ हत्ती बांधा आणि वाफोली परिसरात सक्रिय आहे, तर ‘बाहुबली’ हत्ती आंबोली परिसरात दिसून येत आहे. याशिवाय चार हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यातील तिलारी भागात स्थिरावल्याचे सांगितले जात आहे.


अलीकडेच ‘ओंकार’ हत्तीने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर वन विभागाने त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक पर्यावरणप्रेमी आणि प्राणीमित्र संघटनांनी ‘ओंकार’ला पकडून ‘वनतारा’ संस्थेकडे सोपवण्याच्या निर्णयाचा विरोध केला असून, त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी केली आहे.


बांधा गावातील ग्रामस्थ गुणेश गवास यांनी या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांना साईप्रसाद कल्याणकर आणि शाम धुरी यांनीही पाठिंबा दिला. वन विभागाने मात्र हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे सांगत कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही.


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटकर नगर येथे ‘ओंकार’ला ठेवण्यासाठी विशेष कॅम्प उभारण्याची घोषणा वन विभागाने केली असली तरी प्रत्यक्षात त्या दिशेने अद्याप हालचाल झालेली नाही. त्यामुळे ‘ओंकार’ला तात्पुरते वनतारा संस्थेकडे हलवून, नंतर कोल्हापूर कॅम्प तयार झाल्यावर परत आणले जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून, १४ नोव्हेंबरपर्यंत वन विभागाला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


दरम्यान, आंबोली, वाफोली आणि तिलारी परिसरात हत्तींच्या हालचाली वाढल्या आहेत. सध्या भात कापणी आणि मळणीचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बागायती शेती आणि वायंगणी शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने संरक्षणात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे.


या संपूर्ण प्रकरणामुळे वन विभाग, न्यायालय आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये ताण निर्माण झाला असून, ‘ओंकार’ हत्तीचे भवितव्य पुढील काही दिवसांत न्यायालयीन निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh Narmada cruise accident : बरगी धरणात क्रूझ बुडाले, ४ जणांचा मृत्यू,१०-१५ बेपत्ता

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला.

Maharashtra Din 2026 : ठाण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

ठाणे : महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे

HSC Results 2026 : बारावीचा निकाल काही तासांवर; जाणून घ्या निकाल कुठे आणि कसा पाहता येणार?

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा २०२६ चा निकाल उद्या म्हणजेच शनिवार २ मे रोजी जाहीर होणार

Weather Update : पुढील ४८ तास अतिशय महत्त्वाचे! उष्णतेतून दिलासा, पण अवकाळीचं नवं संकट दारात; IMDचा हाय अलर्ट

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेचा कडाका शिगेला पोहोचला असून विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै