सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात ६ हत्तीचं वावर ; ओंकार हत्तीला सोपवणार वनतारा कडे

सिंधुदुर्ग : सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा वाढता वावर पाहायला मिळत आहे. सध्या या भागात तब्बल सहा हत्तींचा वावर असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली आहे. या हत्तींपैकी ‘ओंकार’ हत्ती बांधा आणि वाफोली परिसरात सक्रिय आहे, तर ‘बाहुबली’ हत्ती आंबोली परिसरात दिसून येत आहे. याशिवाय चार हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यातील तिलारी भागात स्थिरावल्याचे सांगितले जात आहे.


अलीकडेच ‘ओंकार’ हत्तीने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर वन विभागाने त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक पर्यावरणप्रेमी आणि प्राणीमित्र संघटनांनी ‘ओंकार’ला पकडून ‘वनतारा’ संस्थेकडे सोपवण्याच्या निर्णयाचा विरोध केला असून, त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी केली आहे.


बांधा गावातील ग्रामस्थ गुणेश गवास यांनी या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांना साईप्रसाद कल्याणकर आणि शाम धुरी यांनीही पाठिंबा दिला. वन विभागाने मात्र हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे सांगत कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही.


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटकर नगर येथे ‘ओंकार’ला ठेवण्यासाठी विशेष कॅम्प उभारण्याची घोषणा वन विभागाने केली असली तरी प्रत्यक्षात त्या दिशेने अद्याप हालचाल झालेली नाही. त्यामुळे ‘ओंकार’ला तात्पुरते वनतारा संस्थेकडे हलवून, नंतर कोल्हापूर कॅम्प तयार झाल्यावर परत आणले जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून, १४ नोव्हेंबरपर्यंत वन विभागाला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


दरम्यान, आंबोली, वाफोली आणि तिलारी परिसरात हत्तींच्या हालचाली वाढल्या आहेत. सध्या भात कापणी आणि मळणीचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बागायती शेती आणि वायंगणी शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने संरक्षणात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे.


या संपूर्ण प्रकरणामुळे वन विभाग, न्यायालय आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये ताण निर्माण झाला असून, ‘ओंकार’ हत्तीचे भवितव्य पुढील काही दिवसांत न्यायालयीन निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

Comments
Add Comment

उबाठा-मनसे युती म्हणजे अस्तित्वहीन पक्षांची अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसेची अधिकृत युती जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर पक्ष अस्तित्वासाठी एकत्र

हा तर संधीसाधूंचा सत्ता पिपासूपणा, भाजपा नेते मंत्री ॲड. आशिष शेलार यांची टीका मुंबई: मराठी माणसाने तुम्हाला

Gold Silver Rate: सलग चौथ्यांदा सोने चांदी पुन्हा नव्या उच्चांकावर, चांदी एक सत्रात प्रति किलो १०००० रूपयांनी महाग

मोहित सोमण: जागतिक पातळीवरील अस्थिरतेचा फटका म्हणून सलग चौथ्यांदा सोनेचांदीत तुफान वाढ झाली आहे. सोन्याचांदीने

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

पुण्यात मोठा भाऊ कोण? एकच चिन्ह, एकत्र लढत, ठाकरे-मनसे जागावाटपावर वसंत मोरेंचं स्पष्ट मत

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या