माहिम खाडीत २ जण बुडाले! ट्रान्सजेंडर आणि तिच्या मित्राचा जीवघेणा वाद

मुंबई : माहिम खाडीजवळ घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मोबाईलवरील फोटो आणि मेसेजवरून झालेल्या वादातून एक 19 वर्षीय ट्रान्सजेंडरने खाडीत उडी घेतली, तर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या मित्राचाही जीव गेला. अग्निशामक दलाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.


ही घटना आज दुपारी साडेबारा सुमारास घडली. वांद्रे लालमट्टी येथील रहिवासी कलंदर अल्ताफ खान (21) आणि ट्रान्सजेंडर इरशाद उर्फ झारा (19) यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते, आणि ते अलीकडेच भासड्याच्या खोलीत एकत्र राहत होते. पोलीस सूत्रांच्या मते झाराला कलंदरच्या मोबाइल मध्ये दुसऱ्या मुलीचे फोटो आणि चॅट्स सापडले यावरून त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. वाद सुरू असतानाच झाराने अचानक माहिमच्या खाडीजवळ स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आणि पाण्यात उडी घेतली. तिच्या मागे कलंदरनेही तिला वाचवण्यासाठी उडी मारली, मात्र दोघेही बुडाले.


घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. दोन तासांहून अधिक वेळ सुरू असलेल्या शोधानंतरही दोघांचे मृतदेह अद्याप सापडले नाहीत . स्थानिक नागरिकांनीही या बचावकार्यात मदत केली, मात्र प्रयत्न निष्फळ ठरले.


झाराच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कलंदर तिच्यावर वारंवार अत्याचार करायचा आणि ती याआधी तीन वेळा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Comments
Add Comment

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.