क्रिकेटच्या वादातून गोळीबारात तरुणाचा मृत्यू

जळगाव : शहरातील कांचन नगरातील विलास चौकात क्रिकेटच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर असं मृत तरुणाचं नाव असून तर या घटनेत अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. गोळीबार करणारा आकाश सपकाळे हा पसार झाला आहे.


जळगाव शहरात रविवारी दुपारी क्रिकेटच्या वादातून तांबापुरा परिसरात झालेल्या दगडफेकीची घटनेचा तणाव निवळत नाही तोच रात्री कांचन नगरातील विलास चौकात जुन्या वादातून गोळीबार झाला. यामुळे किरकोळ वादातून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे.


कांचननगर भागात दोन युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हद्दपार आकाश सपकाळे उर्फ डोया आणि सागर सपकाळे यांच्यामध्ये जुना वाद आहे.


रविवारी परिसरात संध्याकाळपासून धुसफूस सुरू होती. रात्री हा वाद वाढत जाऊन आकाश याने सागरच्या घरासमोर येऊन गोळीबार केला. यात सागर सपकाळे यांचे भाचे गणेश सोनवणे यांच्या हाताला तर तुषार रामचंद्र सोनवणे यांच्या कानाला व आकाश बाविस्कर यांच्या छातीत गोळी लागली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी आकाश बाविस्कर याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Comments
Add Comment

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा

ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस

इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून

Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा